HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांनी सव्वा रुपयांची किंमत वाढवावी, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर!

मुंबई। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी बँक प्रकरणी दळभद्री आरोप केले आहेत. यामुळे पाटलांविरोधात सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटंल आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना अब्रुनुकसानीच्या रक्कमेत वाढ करण्याचा सल्ला दिला आहे. संजय राऊत माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या अब्रुनुकसानीची किंमत सव्वा रुपये असू शकत नाही यामुळे त्यांनी रक्कमेत वाढ करावी असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. संजय राऊत यांना अवॉर्ड दिला पाहिजे असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनीच आपली अब्रुनुकसानीची किंमत ठरवावी असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

थोडी रक्कम वाढवावी लागेल

भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांना राऊतांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत प्रश्न केला. यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, हरकत नाही, कोणी १०० कोटी, कोणी १५० कोटी तर हे सव्वा रुपया फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवेल की, थोडी रक्कम वाढवावी लागेल याचे कारण म्हणजे शेवटी अब्रुनुकसानीचा दावा म्हणजे काय? माझी मानहानी झाली ती एवढ्या कोटीची आहे. संजय राऊतांची अब्रुनुकसानी एवढ्या रुपयांची नाही आहे. त्यामुळे त्यांनी थोडी रक्कम वाढवावी असा चिमटा चंद्रकांत पाटील यांना काढला आहे.

अब्रुनुकसानीची किंमत त्यांनी ठरवावी पण सव्वा रुपये किंमत नाही

राजकारणामध्ये एकमेकांविरोधात बोलायला लागले हे जरी खरं असलं तरी आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. हिंदू संस्कृतीमध्ये एकमेकांला चिमटा जरी काढला तरी जखम होता कामा नये, यामुळे मी चिमटा काढतो पण जखम होत नाही. यामुळे संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीची किंमत त्यांनी ठरवावी पण सव्वा रुपये किंमत नाही. सातत्याने रोज बोलणारे, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही सातत्याने रोज लिहिणारे नावाचा एक पुरस्कार द्यायचा झाला तर संजय राऊत यांना देईल. तेच रोज बोलत असतात शिवसेनेतून बाकी कोण बोलत नाही. रविंद्र वायकर, अनिल देसांईंसह अन्य नेते बोलत नाहीत. फक्त संजय राऊत बोलत असतात त्यामुळे त्यांना अवॉर्ड दिला पाहिजे.

सव्वा रुपयांचा दावा ठोकणार

संजय राऊत यांनी म्हटलंय की, आमच्यावर टीका असतानाही पत्र काना मात्र्याचा बदल न करता छापले आहे. प्रचंड टीका आणि घाणेरड्या शब्दात टीका केली आहे. सध्याच्या भाजपची ती संस्कृती आहे. पाटील यांनी दळभद्री आरोप केले आहेत. पीएमसी बँक बाबत केलेल्या आरोपांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. दावा लावू पण इतर नेते १०० कोटी, १५० कोटी लावतात तसा नाही सव्वा रुपयाचा दावा लावू असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच यांची जेवढी लायकी तेवढाच दावा लावायचा असं संजय राऊत यांनी म्हटंल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रदिनी नांदेडच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांसह, टाटा,आक्षय कुमार संवाद साधणार

News Desk

मुख्यमंत्री फडणवीस सर्वात बालीश: शरद पवार

News Desk

एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Aprna