HW News Marathi
महाराष्ट्र

“भल्या पहाटेही झालाच होता मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न”,राऊतांचा अजित पवारांना चिमटा

मुंबई | गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेचा सामनातून समाचार घेण्यात आला आहे. फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपचे डावपेच आहेत असा आरोप आजच्या (३१ मार्च) सामना अग्रलेखातून भाजपावर केला आहे. दरम्यान, राऊतांना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिठाचा खडा टाकू नये या वक्तव्यावरही भाष्य करत टोला लगावला आहे.

२ दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल रोखठोक मत मांडल्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असा सल्लाच संजय राऊत यांना दिला होता. आजच्या अग्रलेखातून अजित पवारांच्या या वाक्याचा संदर्भ पकडत भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

”भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही. एक वेळ दुधात पडलेला मिठाचा खडा बाहेर काढता येईल, पण गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण, असा सध्याचा सिद्धांत आहे.”, अशा शब्दात सामनातून अजित पवारांना कानपिचक्या घेण्यात आल्या आहेत.

काय म्हणाले होते?

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. बऱ्याचदा उपमुख्यमंत्री कोण होणार, याचे निर्णयदेखील घेतले आहेत. याबद्दल महाविकास आघाडी वगळता एखाद्या त्रयस्थाने काही विधान केल्यास समजू शकतो. पण महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सरकारचे कामकाज सुरू असताना मिठाचा खडा टाकू नये, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांना सुनावले होते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधाने करू नयेत. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. आपल्यातील कोणी अशा प्रकारे एखाद्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही पवार यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या नागरिकांच्या तक्रारी

News Desk

होळी घराच्या दारात पेटवायची नाही, मग काय घरात पेटवायची? भाजपचा सरकारला सवाल

News Desk

मुनगंटीवारांची नाराज पोलिसांना साद, दबावाखाली न येता राज्यपालांकडे तक्रार करण्याचे आव्हान

News Desk