HW News Marathi
महाराष्ट्र

“शेतकरी आंदोलनात शेतकरी मृत्यूमुखी पडले तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत”, राऊतांचा निशाणा

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (१० फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांना निरोप देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले. त्याचसोबत गुलाम नबी आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावर, नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, संसदेत काल झालेल्या प्रकारावर इतकेही भावनिक होण्याची गरज नव्हती. अशाप्रकारे अश्रूंचा बांध फुटणे हे काही नवीन नव्हते. देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे संसदेत रडतात, हा एक प्रकारचा विक्रम आहे. कारण आतापर्यंत ५ ते ७ वेळा नरेंद्र मोदी भावनिक झाले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितले. यासोबतच दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत, अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले, तेव्हा नरेंद्र मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जालना नगरपालिकेने केली 20 कोटींपैकी फक्त 70 लाखांची वसुली

News Desk

बडबड करणा-या लोकांना उत्तर देण्याची गरज नाही, रामदेवबाबांचा दिग्विजय यांना टोला

News Desk

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची गिरीष महाजन यांनी केली चौकशी

Aprna