HW News Marathi
महाराष्ट्र

जालना नगरपालिकेने केली 20 कोटींपैकी फक्त 70 लाखांची वसुली

शुभम देशमाने

जालना – गेल्या कित्येक वर्षापासून थकीत असलेल्या सुमारे वीस कोटी रूपयांपेक्षा अधिकच्या थकबाकीपैकी फक्त सत्तर लाख रूपयांची थकबाकी करण्यात जालना नगरपालिकेला यश आले आहे. ही वसुली फक्त फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली आहे. याशिवाय थकबाकीदारांच्या अकरा स्थावर मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. नगरपालिकेच्या दहा पथकांकडून ही वसुली करण्यात आली.

जालना नगर पालिकेची करांच्या स्वरूपात सुमारे २० कोटींपेक्षा जास्त रक्कम बऱ्याच वर्षांपासून थकित आहे. पालिकेकडे ५५ हजार मालमत्तांची नोंद आहे. शासनान दोन महिन्यांसाठी नगर पालिकांसाठी विशेष कर वसुली अभियान राबवत आहे. त्यानुसार थकित मालमत्तांच्या कर वसुलीसाठी दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पथकाने ११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यात हिरालाल कवा, अमर अमित रोलिंग मिल, सम्राट सिलिंडर, फाईन आर्ट कंपनी, हरिओम स्टिल इंडस्ट्रीज, आदिनाथ यांची मालमत्ता, भूषण राठोड, लंकाबाई मदन, कलंदर खा गुलाब खा, अ. रहीम अ. अमोनोद्दीन चौधरी, हिरालाल किल्लेदार आदींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे . जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. असे मुख्याधिकारी संतोष खांडेकर व कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे यांनी सांगितले. कर वसुलीसाठी थकबाकीदाराच्या घरासमोर बँड वाजविण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत मोबाईल टॉवर कंपनीकडून दुप्पटीने कर वसुली केली जाणार असल्याचे नगरपालिकेडून सांगण्यात आले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पावर समानधानकारक उत्तरे नाहीत, फडणवीसांचा सभात्याग

swarit

परळीत दोन गटात तुफान हाणामारी; संभाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल

Aprna

औरंगाबाद घटनेनंतर बोध घेण्याची नितांत गरज, फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

News Desk