HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट, राजकीय स्थितीवर चर्चा नाही

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. सरकार स्थापनेत शिवसेना कुठेही अडथळा ठरत नसल्याचे राऊतांनी राज्यपालांना सांगितले. तसेच राज्यपालांसबोत राजकीय स्थितीवर चर्चा केली नसल्याचा दावा राऊतांनी केला. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला. राऊतांनी आज (४ नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषदे घेऊन राज्यभालांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे सांगितले होते.

राऊत पुढे म्हणाले की, राज्यपालांची भेट ही सदिच्छा भेट असून एका मर्यादेत राहून राज्यपालांशी चर्चा गेल्याचे देखील राऊतांनी भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यपाल हे घटनेनुसार काम करत आहे. तसेच कोश्यारी हे अनुभवी नेते हे राज्याला राज्यपाला म्हणून लाभले आहे. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे. आम्हीही त्यांच्यासोबत काम केले आहे. निवडणूक झाली, निकाल आला, यादरम्यान त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांची भेट घेतल्याचे राऊतांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला’, माजी खासदार शिवाजीराव आढळरावांचा घणाघात!

News Desk

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट! – उद्योगमंत्री उदय सामंत

Aprna

नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार, मंत्रिमंडळात घेतला निर्णय

Aprna