HW News Marathi
महाराष्ट्र

“भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू”, राऊतांचा कन्नडिगांना इशारा

बेळगाव | संजय राऊत यांनी बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांवर तोड डागली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी काल (१४ एप्रिल) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावात प्रचारसभा घेतली. बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक सरकार आणि सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिगांना इशारा दिला आहे. ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, अशा शब्दात संजय राऊत यांनी बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांवर तोड डागली आहे.

तुम्हाला पश्चिम बंगालमधील अन्याय दिसतो, मग बेळगावातील दिसत नाही का? मोदी-शहांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन करण्यासाठी फिरत आहे. ममता दीदी तिथे अन्याय करत असल्याचं ते सांगत आहेत. पण तुम्ही बेळगामध्ये काय घडतंय ते इथं येऊन पाहा, इथं खून पडत आहेत. तुम्हाला पश्चिम बंगालमधील अन्याय दिसतो, मग बेळगावातील दिसत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी मोदी-शाहांना केलाय. तसंच पंडित नेहरुंनी केलेली चूक दुरुस्त करा, असं आवाहनही राऊतांनी केलं आहे.

दादागिरीची भाषा करण्यात आम्ही हिटलर आहोत

दादागिरीची भाषा करण्यात आम्ही हिटलर आहोत. महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ज्योत शुभमच्या निमित्तानं पुन्हा पेडल्याचं सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळकेला विजयी करण्याचं आवाहन राऊतांनी बेळगावातील मतदारांना केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढता

शुभमचं वय लहान असेल पण वजनदार माणूस आहे. सीमाभागाचे वजन घेऊन तुला लोकसभेत यायचं आहे. शिवसेनेचे २१ खासदार आहेत आणि तू २२ वा असशील, अशा शब्दात राऊतांनी शुभम शेळके यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. ही लढाई फक्त शुभमची नाही तर देशात जिथं जिथं मराठी माणूस आहे त्याच्या अस्मितेची आहे. शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा कर्नाटकापर्यंत आल्या असत्या. तुमची सुंता झाली असती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढता, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीतील बार्टीच्या विद्यार्त्यांचे १० व्या दिवशी साखळी उपोषण स्थगित; धनंजय मुंडेंचे आश्वासन

Aprna

Bhima Koregaon | भिमा कोरेगाव हिंसाचारातील पाचही आरोपींच्या नजरकैद वाढ, मुख्यमंत्र्यांनी केले निर्णयाचे स्वागत

News Desk

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात 16 जानेवारीला नागपूर ‘राजभवनाला घेराव’ घालणार!- बाळासाहेब थोरात

News Desk