HW News Marathi
देश / विदेश

बिहारमध्ये कोरोना संपला का? तसं असेल तर केंद्राने जाहीर करावं, राऊतांचा खरमरीत टोला

मुंबई | कोरोनाच्या संकट काळात इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. बिहारमध्ये कोरोना संपला का?, असा प्रश्न विचारत बिहारमध्ये कोरोना संपला असेल तर केंद्र सरकारने तसं जाहीर करावं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर सडकून टीका केला आहे.

बिहारमध्ये कोरोना संपला का? असा सवाल करतानाच लोकांना मदतीची गरज आहे. त्यांना बोटावर शाई लावण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले आहे. देशात कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती आहे. लालूप्रसाद यादव तुरुंगात असले तरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्यांमध्ये आणि देशांत कोरोनाच्या भीतीने अधिवेशन होत नाही. एक मंत्री, ३ खासदारांचे निधन झाल्याने संसदेचं अधिवेशन गुंडाळलं. मग विधानसभा निवडणूक का घेतली जात आहे? एकदाचं कोरोना नावाचं प्रकरण संपवून टाकलं असं जाहीर करा, असंही त्यांनी म्हटले आहे.

बिहार निवडणुकीत सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा मुद्दा राहणार आहे. जेडीयूने तर निवडणुकीसाठी सुशांतची पोस्टरही छापली आहेत. सुशांतसिंह आत्महत्येचा मुद्दा निवडणूक प्रचारात असावा म्हणून त्याच्या आत्महत्येचं राजकारण केलं गेलं. जोर जबरदस्ती आणि धाकदपटशा करून हे मुद्दे प्रचारात आणले गेले. तिथल्या पोलीस प्रमुखांनी या नाट्यात पडदा ओढण्याचं काम केलं. आता ते बक्सरमधून निवडणूक लढणार आहेत. हे नाट्य आधीच ठरलं होतं. त्यानुसार सगळं चाललं आहे, असा दावा राऊतांनी केला आहे.

सुशांत प्रकरणाचा तपास पुढे जाईल असे वाटत नाही. कारण आता सीबीआय कुठेच दिसत नाही. मारूती कांबळेचं काय झालं? असा सवाल ‘सिंहासन’ या मराठी सिनेमातून विचारला गेला होता. तसंच आता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं काय झालं? असं विचारावं लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामूळे यावर आता भाजपकडून काय उत्तर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भगत सिंह कोश्यारींनी राज्यपाल पद सोडण्याची पंतप्रधान मोदींकडे केली इच्छा व्यक्त

Aprna

उद्धव ठाकरेंनी सोबत घेतलेल्या ‘त्या’ दोन भुतांचा देवावर विश्वास नाही !

News Desk

भंगारात सापडलेल्या नाण्याची किंमत दीड कोटी

News Desk