HW News Marathi
महाराष्ट्र

कंगणाचा विषय माझ्यासाठी संपला-संजय राऊत

मुबंई| कंगणा राणावतने केलेली वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यानतंर शिवसेना विरूद्ध कंगणा असा वाद संपुर्ण देशाने पाहिला.मुंबईत आल्यानंतर कंगणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना टार्गेट केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही आरोप केले.मात्र सध्या शिवसेना आणि इतर राजकीय नेत्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया न देण्याची सुचना वरच्या नेत्यांनी दिली असल्यामुळे सध्या कोणी प्रतिक्रिया देत नाही,राऊतांनी तर कंगणाचा विषय आपल्यासाठी संपला आहे असे म्हणतं यापासून आता हात काढला आहे.काल कंगणा मुंबईत आल्यानंतरसुद्धा राऊतांनी यावर मौन बाळगलं.

खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना, ‘मी कधीच कंगनाला धमकावले नव्हते. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याबद्दलचा माझा राग मी व्यक्त केला होता. आज पालिकेने जी कारवाई केली त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्यापुरता हा विषय संपला आहे. मुंबईत कंगनाचे स्वागत आहे, ती येथे राहायला मोकळी आहे,’ असे राऊत स्पष्ट केले. याबाबतची पोस्टही त्यांनी ट्विटरवर शेअर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख उद्याच जाहीर होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

‘वसुली सरकारचा रिमोट कंट्रोल मातोश्रीवर नाही तर,’ सिल्व्हर ओकवर भाजपचा आरोप!

News Desk

योगी आदित्यनाथ बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत – चंद्रकांत पाटील  

News Desk