HW News Marathi
देश / विदेश

“तुमचे गुजरातवर प्रेम आहे पण देशाचे पंतप्रधान आहात हे विसरु नका”

मुंबई | महाराष्ट्रातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आपण सगळे आलो आहोत. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास देवेंद्र फडणवीस यांचा असलेला विरोध हा भाजपच्या राजकीय भूमिकेमुळे आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे सध्या केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे.

मात्र, जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

आज (११ एप्रिल) ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील कोरोना परिस्थितीचं पुरेसं गांभीर्य नसल्याची टीका केली आहे. सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का, याचा विचार झाला पाहिजे. मात्र, केंद्र सरकार प्रत्येकवेळी आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेते.

तुमचे लोक प्रचार करत आहेत किंवा निवडणुका आहेत म्हणून माणसं मारता येणार नाही. निवडणुका आणि राजकारणापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. त्याठिकाणी कोरोना नाही, असे नव्हे. थोड्याच दिवसांत भयावह परिस्थिती समोर येईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असे त्यांनी सांगितले. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

पुण्यात भाजपचा महापौर असल्याने केंद्र सरकारने थेट तिकडे लसींचा साठा पाठवला. हा खोटारडेपणा झाला. पुण्याला लसी मिळत असतील तर मुंबईलाही मिळाल्या पाहिजेत असा हट्टही यावेळी राऊतांनी मांडलेला पाहायला मिळाला. पुढे ते असंही म्हणाले की, अन्यथा राजू शेट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूटमधून लसीचा एक ट्रकही बाहेर पडू देणार नाही, ही भावना लोकांच्या मनात वाढीस लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या औषधांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होणे योग्य नाही. फक्त गुजरात तुमचा नाही तर संपूर्ण देश तुमचा आहे. तुमचे गुजरातवर अधिक प्रेम आहे, हे समजू शकतो. पण आपण देशाचे पंतप्रधान आहोत, ही गोष्ट नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवायला हवी, असे राऊत यांनी म्हटले. तसेच प्रकाश जावडेकर यांनी केंद्रात बसून आम्हाला ज्ञानामृत वाटण्याची गरज नाही. त्यांनी मुंबई किंवा पुण्यात येऊन येथील परिस्थिती बघावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, हाथरस प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

News Desk

‘माजी पंतप्रधान राजीव गांधी’ यांच्या नावाने नव्या पुरस्काराची राज्य सरकारकडून घोषणा!

News Desk

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk