HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे

पंढरपुर | पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे. याची सुरुवात मी स्वत:पासून करणार असल्याचे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरातील एका कार्यक्रमता केले आहे. पुढे पवार असे देखील म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी आमच्यापेक्षा जास्त ताकद लावल्यामुळेच त्यांच्या विजय झाला, असल्याची प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली.

तसेच नुकतीच पार पडलेली विधानपरिषदेची निवडणूक पाहता ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुण पिढीला संधी देण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गरज ओळखून आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुण रक्ताला वाव द्यायला पाहिजे. याची सुरुवात मी स्वत:पासून करणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पवार त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे किंवा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांपैकी नक्की कोणाच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपवतील, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनसेचे मुंबई, पुण्यातील २ मेळावे अचानक रद्द; कारण काय?

News Desk

आम्ही त्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही, नाना पटोलेंचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

News Desk

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Aprna
क्राइम

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावमधून आणखी एक जण ताब्यात

Gauri Tilekar

बेळगाव | जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आता अजून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. बेळगावमधील गणेशपूर येथील एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या युवकाचे नाव सागर असून त्याने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पळून जाण्यासाठी त्याच्या गाडीचा वापर करण्यात आल्याचा एसआयटीकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणाशी जर सागरचे कोणत्याही प्रकारचे संबंध आढळले तर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

एसआयटीकडून बेळगावातून एक ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी हत्येनंतर याच ओमनीचा वापर करून तिथून पळ काढला असल्याचा संशय एसआयटीला आहे. तसेच ही ओमनी सागरची असल्याची शंकादेखील व्यक्त करण्यात येत आहे. १९ ऑगस्ट रोजी एसआयटीचे एक पथक बेळगावात दाखल झाले होते. सागर हा राजकारणाशी तसेच हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे आणखी तीन संशियितांची रेखाचित्रे देखील एसआयटीकडे आहे.

याआधी डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा सीबीआयकडून केला गेला होता. तसेच विरेंद्रसिंह तावडेसोबत मिळून सचिन अंदुरेने या हत्येचा कट रचला होता, असा दावा देखील सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला होता.

Related posts

फेसबुक पोस्टमुळे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

swarit

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna