HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण आंदोलन तुर्तास मागे

मुंबई | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करणार होते.अण्णा हजारे हे उद्यापासून (१४ फेब्रुवारी) उपोषण करणार होते. परंतु, अण्णा हजारांचे उद्या उपोषण करू नये, असा ठराव ग्रामसभेत ठरवण्यात आले. यानंतर ग्रामसभेत अण्णांच्या वयाचा विचार करून त्यांनी उपोषण मागे त्यांना विनंती केली. यानंतर अण्णांनी आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे. अण्णांनी आंदोलन करण्यासाठी आज (१३ फेब्रुवारी) राळेगणसिद्धीत येथे ग्रामसभा झाली. 

“मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही, सरकारला निरोप पोहचवा,” असे म्हणत अण्णा हजारे यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावरून अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे हे उद्यापासून (१४ फेब्रुवारी) आमरण उपोषणावर बसणार आहेत. अण्मा हजारे हे राळेगणसिद्धच्या आज (१३ फेब्रुवारी) ग्रामसभेनंतर बोलताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. अण्णा हजारे म्हणाले, “तुम्ही वाईन का आणता आणि तुम्ही सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवताय का?, म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचे नाही. हा प्रश्न राळेगणसिद्ध नाही राज्याचा आहे. जो वाईनचा निर्णय घेऊ तो जनतेला विचारून घेऊ, मला जगायची इच्छा राहिली नाही उद्यापासून मी आमरण उपोषण करणार आहे. कारण माझे मन मरून गेलेले आहे.

अण्णा हजारे नेमके काय म्हणाले

“महाराष्ट्रात परमीट रुम कमी आहेत का?, मग सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री का ?, वाईन ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?, छत्रपती शिवाजींच्या राज्यात वाईन ही संस्कृती आहे. तुकाराम महाराजांच्या राज्यात वाईन ही संस्कृती आहे. ही संस्कृती जनत करण्यासाठी किर्तनकार किर्तन करातत. मुलांवर संस्करा व्हावे, म्हणून रात्रांदिवस किर्तन करतात. आणि तुम्ही किराणा दुकानात वाईन ठेवून ही संस्कृती बर्बाद करायला निघालात. म्हणून जगण्याची इच्छा होत नाही. आता झाले ८४ वर्ष खूप झाले. अशा प्रकारचे हे निर्णय राज्य सरकार जे घेत आहे. काल त्यांचे सेक्रटरी आले, मी त्यांना विचारले तुम्ही लोकशाहीला मानताना. लोकशाही ही लोकांची आहे. तुमचे मंत्रिमंडळ मनाने निर्णय घ्याला लागले. तुम्ही याला लोकशाही म्हणार का?, मंत्रिमंडळाला जर निर्णय घ्याचा आहे, तर तुम्ही आधी जनतेची मान्यता घ्यावी. आपली देशात लोकशाही आहे, आणि तुम्ही सर्वजण सेवक आहात. त्यामुळे जनतेची परवानगी घ्याला हवी. जनतेने परवानगी न घेता मंत्रीमंडळाने मनाने निर्णय घेताल. ही लोकशाही नाही, हुकूमशाही आहे. म्हणून मी ठरविले की, तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते पण… शिवसेनेचा गौप्यस्फोट

News Desk

22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कारामुळे बीड जिल्हा हादरला

Aprna

‘पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावली दिपाली सय्यद,’ 10 कोटींची मदत!

News Desk