HW News Marathi
महाराष्ट्र

अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळून २५ जण नदीत कोसळले

सातारा | मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रा जात असतानाच अचानक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात मृतदेहासह २५ जण नदीत कोसळले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावात घटना घडली असून या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी (३० डिसेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

हा पूल नादुरुस्त अवस्थेत होता व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या २० वर्षांपासून याची कोणतीही डागडुजी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर या आपघातात रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाचगणी येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, महाबळेश्वरपासून अंदाजे ४० किमी अंतरावर खरोशी गावात कृष्णाबाई कदम यांना अंत्यसंस्कारासाठी नेत असताना गावाच्या मंदिराजवळ असलेला वीस वर्ष जुना लोखंडी पूल कोसळला यामध्ये भीमराव भागू कदम, अशोक चांगु कदम, शंकर चांगु कदम, रामचंद्र कदम, विजय शंकर कदम, राजेश शंकर कदम, रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे जखमी झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली! – मुख्यमंत्री

Aprna

लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर विश्वविक्रमी रस्ता बांधकाम

Aprna

राजकीय घडामोडींना वेग, सत्तास्थापनेच्या दृष्टीने राज्यात दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी

News Desk