HW News Marathi
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एसटीकडून मोफत पास

मुंबई | यंदा महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. या दुष्काळाच्या झळा राज्यातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहे. ही परीस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील जवळपास ७६ तालुक्यातील महसुली मंडळातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून एसटीचा सवलत पास मोफत देण्यात येणार आहे. यांसंदर्भातील घोषणा राज्य परिवन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शनिवारी(२९ डिसेंबर) केली. पुर्वी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली आहे. आता महसुली मंडळातील विद्यार्थ्यांना १ जानेवारी २०१९ पासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अत्यंत कमी झालेल्या पावसीमुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे अनेक अडचणींचा सामना करीत आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदातेच आहेत .सध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागीतल लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा,महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पासमध्ये १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे रावते यांनी सांगितले. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी १०० टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे. राज्यातील साधारण ४२ लाख ३ हजार विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा सध्या लाभ मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी!

News Desk

बागायती क्षेत्राच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार साहेबांचा एक फोन पुरेसा – बाळासाहेब थोरात

News Desk

भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

News Desk
महाराष्ट्र

मन की बातमधून मराठमोळ्या वेदांगी कुलकर्णीचे मोदींकडून कौतुक

News Desk

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्षातील शेवटची ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आज (३० डिसेंबर) देशवासियांशी संवाद साधला. आज मन की बात या ५१ व्या रेडिओ रेडिओच्या माध्यमातून संवाद साधताना मोदींनी मराठमोळ्या पुण्याची ‘सायकल कन्या’ वेदांगी कुलकर्णीचे कौतुक केले. वेदांगी १९ वर्षीय असून तिने सायकलवरून जगभ्रमंती करण्याचा संकल्प केला आहे. वेदांनीने आतापर्यंत २८ हजार किलोमीटर प्रवास केला आहे.

या प्रवासात आतापर्यंत १५ देशांची भम्रंती केली आहे. वेदांगीने प्रवासाला सुरुवात करून १८० दिवस पूर्ण झाले आहेत. वेदांगी दिवसाला ३०० किलोमीटर प्रवास करते. जगभ्रमंती सायकलने करण्यासाठी २९ हजार किमी प्रवास पूर्ण आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियातून सायकल भ्रमंतीला वेदांगीने सुरुवात केली होती. तेथून वेदांगीने न्यूझीलंड, कॅनडा, ग्रीनलँड, स्पेन, फिनलँड, रशिया आणि भारत अशा चौदा देशांमध्ये सायकल प्रवास केला. चाकूहल्ला, पैसे लुटले जाऊनही वेदांगदीने जिद्द सोडली नाही.

 

Related posts

“…अन्य मंडळांचं देखील विलीनीकरण करावं लागेल!” – शरद पवार

News Desk

“सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही!”, देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्ला

News Desk

जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, रंजना पाटील विजयी

News Desk