HW News Marathi
महाराष्ट्र

शहीद जवान नरसिंग जिल्लेवाडवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार

उत्तम बाबळे (नांदेड) :- भोकरचे भूमीपूत्र शहीद जवान नरसिंग जिल्लेवाड याच्यावर हजारोंच्या साक्षीने शोकाकूल वातावरणात शनिवारी भोकर येथील वैकुंठधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय इंडो तिबेटियन सिमा सुरक्षा दलातील जवान नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांना 22 रोजी भारत चीन सिमेवर कर्तव्य बजावताना वीर मरण आले. तेथील भौगोलीक परिस्थितीशी सामना करत २५ ऑगस्ट रोजी गुहाटी येथे त्यांचे पर्थिव आणण्यात आले. २६ रोजी सकाळी ९:०० वाजता भारतीय तिबेट सिमा सुरक्षा दलाचे कॅप्टन जोयंता सैकिया व बीजू वर्जिस यांनी आपल्या ११ जणांच्या चमूसह ते पार्थीव अँब्लूलन्स व्हॅनने भोकर येथे त्यांच्या घरी आणले. यावेळी शहीद नरसिंग जिल्लेवाड यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन हजारो नागरिकांनी घेतले.

दुपारी बारा वाजता जिल्लेवाड यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरुन व्यंकटेश टाॅकीज येथून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैक ते गांधी चाैक मार्गे वैकुंठधाम हिंदू दहनभूमी येथे निघाली. यावेळी भोकर शहरातील व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली होती व हजारो नागरीक अंत्ययात्रेत सहभागी होऊन ” भारत माता की जय!,अमर रहे अमर रहे, शहीद नरसिंग जिल्लेवाड अमर रहे !”च्या जयघोषानांनी शहर दणानून सोडले होते. दहनभूमीत शहीद नरसिंग जिल्लेवाड यांना प्रथम भारतीय इंडो तिबेटियन सिमा सुरक्षा दलाच्या जवानांनी व नंतर नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीसांनी बंदुकीच्या तीन फे-या हवेत झाडून सलामी दिली.तसेच पोलीस दलातर्फे अति.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके, पो.नि.रामा पडवळ यांनी व महसूल विभागातर्फे उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली. यानंतर शहीद नरसिंग जिल्लेवाड यांच्या चितेला त्यांचा मुलगा ओंकार याच्या हस्ते भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा.नागेलीकर, सभापती जगदिश पाटील, नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, उपनगराध्यक्ष गोविंद पाटील,जि. प. सदस्य बाळासाहेब रावणगावकर, दिवाकर रेड्डी, रा. काँ. पार्टीचे ता. अ. सुभाष पा. घंटलवार, जवाजोद्दीन बरबडेकर, नगरसेवक शे. वकील शे. खैराती, नगरसेवक खाजा तौफिक इनामदार, राजेश्वर कदम,शिवसेना ता. प्र. सतीश देशमुख, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, प्रा.डॉ..व्यंकट माने, संपादक उत्तम बाबळे, युसूफ भाई, अ.सलीम सर,प्रकाश कोंडलवार, बाळा साकळकर, एल. ए. हिरे, मनोहर बट्टेवाड, श्रीनिवास बोलेवार, बाळू डुबूकवाड, मोहन श्रीकंठवाड, ओम पिंगलवाड, दिलीप वाघमारे, कोटूरवार यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी,कर्मचारी, व्यापारी, पत्रकार, नातेवाईक, मित्रपरिवार,आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नियम बाजूला ठेवत भागवत कराड यांनी विमानात केले आजारी प्रवाशावर उपचार!

News Desk

चित्रा वाघ म्हणतात रावणाला मदत करणारी शुर्पणखा, आता चाकणकरांकडून उत्तर!

News Desk

“फक्त अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी ईडीकडून अविनाश भोसलेंवर कारवाई?” – अंजली दमानिया

News Desk
कृषी

गुळ क्लस्टरसाठी निधी देऊ – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

News Desk

कोल्हापूर : कोल्हापूरचा गुळ जगप्रसिद्ध असून गुळ क्लस्टरच्या निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे बोलताना दिली.

मेक इन कोल्हापूर संकल्पनेंतर्गत सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार चंद्रदिप नरके, आमदार संध्यादेवी कुपेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

मेक इन कोल्हापूरसाठी उद्योजकांनी सक्रीय होऊन पुढाकार घ्यावा, शासन खंबीरपणे पाठीशी राहील, अशी स्पष्ट ग्वाही देऊन मुनगंटीवार म्हणाले, मेक इन महाराष्ट्रसाठी मेक इन कोल्हापूर बनविणे आवश्यक आहे. येथील औद्योगिक क्षेत्राला तसेच पर्यटनाला गती देण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल. महाराष्ट्राची देशात उत्पादनामध्ये मोठी आघाडी असून महाराष्ट्रात उद्योगाचे स्वत:च क्लस्टर निर्माण केले आहे. राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात असे उद्योग विकसित करुन नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास करण्याचा ध्यास शासनाने घेतला असून महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

पर्यटन व्यवसायात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असल्याने राज्यात पर्यटनावर अधिक भर दिला जात आहे. कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी शासन कटिबद्ध असून यासाठीचे प्रस्ताव प्राधान्य क्रमाने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही देऊन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेक इन कोल्हापूर ही संकल्पना यशस्वी करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चितपणे केल्या जातील. कोल्हापुरात जैव विविधता संशोधन केंद्राबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. कोल्हापुरच्या गुळाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच गुळासाठीचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी आवश्यक लागणारा‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

Related posts

पुजारी दांपत्याची किमया, नापीक जमिनीत फुलवली ड्रॅगन फ्रुट्सची शेती

News Desk

शेतकरी सन्मान योजनेचा बोजवारा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले पैसे गेले परत

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 16 जुलैपासून दूध संकलन बंद

News Desk