HW News Marathi
महाराष्ट्र

‘पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज(२७ जुलै) पत्रकार परिषद घेतली असून, यात त्यांनी पूरग्रस्तांना मदत करणार असल्याची गोष्ट केली आहे. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून मदत केली जाणार असून २५० डॉक्टरांचं पथक देखील पूरग्रस्त भागात पाठवणार असल्याचं पवारांनी सांगितलं. त्यांनी यावेळी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं आहे.

नेत्यांनी दौरे टाळावेत

पुरग्रस्थ भागात अनेक नेते मंडळी जाऊन तिथली पाहणी करत आहेत. “माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनांनंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यक्त आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, त्यामुळे नेत्यांनी दौरे टाळावेत”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस तरी इथं येऊ नका

शरद पवार यांनी त्यांच्या आठवणीतला एक किस्सा सांगितलं जिथे त्यांनी पंतप्रधानांना दहा दिवस तरी येऊ नका असं सांगितलं होतं. “मी लातूरला असताना आम्ही सगळे जण कामात होतो. पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस तरी इथं येऊ नका. तुम्ही आलात तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे की त्यांनी माझी विनंती मान्य केली होती आणि ते दहा दिवसांनंतर आले. कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.

माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं

पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असून, त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, “पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे”, असं पवार म्हणाले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

’12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात फडणवीस म्हणाले…..’

News Desk

जेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक! – उदय सामंत

Aprna

कोरोना रुग्णांची वाढती संख्या; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

Aprna