HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपुरातून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला आग

सांगली | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना होती. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील चालकांसह सर्व शिवसैनिक सुरक्षित आहेत.

उद्धव ठाकरे यांची सोमवारी (२४ डिसेंबर) पंढरपूर येथे महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून शिवसैनिक पंढरपुरात दाखल झाले होते. त्यासाठी शिवसैनिकांनी एसटी महामंडळाची एक बस भाड्याने घेतली होती. परंतु सभेहून परतत असताना पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर बसने अचानक पेट घेतला. गारगोटी आगाराची बस क्रमांक एमएच१४बीटी – ०७२८ ही पंढरपूरहून गारगोटीला जात होती. या बसमध्ये ४२ शिवसैनिक असून कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी संकेतस्थळाचे लोकार्पण

News Desk

अॅपे रिक्षातून पडून विद्यार्थ्यीनीचा मृत्यू

News Desk

रक्ताच्या बाटल्या फोडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

News Desk
राजकारण

महाआघाडीमध्ये आता चंद्रबाबू नायडू यांचा समावेश

Gauri Tilekar

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. अखेर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष या दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे. प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आता या महाआघाडीमध्ये तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडूचंद्रबाबू नायडू यांचा समावेश झाला आहे.

राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोघांमधील भेट झाली असल्याचे अंदाज व्यक्त केला जात होताच. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी आता ते एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे.

Related posts

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk