HW News Marathi
महाराष्ट्र

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शिवसैनिकांचे आमरण उपोषण

तासगाव | शिवसेना तासगाव शहर प्रमुख संजयदाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तासगाव नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास दिरंगाई करत असल्यामुळे बेमुदत आमरण उपोषण आज सुरु करण्यात आले आहे. तमाम शिवप्रेमींनी १ जानेवारीला तासगाव बंद केले होते. यावेळी काही शिवसैनिकांनी नगराध्यक्षांची केबिन फोडली होती. सर्व शिवप्रेमींनी जागरण- गोंधळ करत अनोखे आंदोलन केले होते. आज शिवसेना शहरप्रमुख संजयदाजी चव्हाण यांच्यासह शिवसैनिक आमरण उपोषणास बसले आहेत, पुतळा कधी होणार हे नगरपालिकेने लिहून द्यावे त्याच दिवशी पूतळा बसला पाहिजे अशी मागणी आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?

शिवाजी महाराज यांचा उभा पुतळा नगरपालिकेने कोणतीही परवानगी नसताना काढला आणि त्या ठिकाणी घोड्यावरचा पुतळा बसवायचा ठरला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. याबद्दल विचारणा करताच नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी हे उडवाउडवीची उत्तरे देत असत. त्यानंतर नवे मुख्याधिकारी गणेश शिंदे आल्यानंतर शिवाजी महाराज यांचा जुना पूतळा कोणतीही परवानगी नसताना काढल्याचे लक्षात आले.

शिवसेना तासगाव शहर अध्यक्ष संजयदाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज यांचा पुतळा अद्याप पर्यंत बसवलेला नाही याचे निषेर्धात तासगाव नगरपालिकेच्या निषेर्धात तासगाव नगरपरिषद तासगाव समोर उपोषणाला बसले आहेत जनसमुदाय ५ ते ७ कार्यकर्तेसोबत बसले आहेत योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे हालचालीवर लक्ष ठेवून आहोत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“रायगडावर लायटिंग केली, हे उत्साही लोकांमुळे घडतंय”, रायगडावर केलेल्या लायटिंगवरुन उपमुख्यमंत्र्यांचीही नाराजी

News Desk

जालन्यात रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती, दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित

News Desk

पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवण्याची मागणी, गृहमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk
महाराष्ट्र

पुणे महापालिकेचा पाणीकपातीचा निर्णय

Gauri Tilekar

पुणे | पुणे शहराला दररोज सुमारे सोळाशे एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ साडे अकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा बैठकीत झाला आहे. पुण्यात सध्या मध्यवस्तीत दोन वेळा तर उपनगरात एक वेळा पाणी पुरवठा होत आहे. परंतु आता पुण्यात पाणीकपात सुरु केली जाणार असून पुणेकरांकडे दिवसातून एकदाच पाणी येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत खडकवासला कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि उपस्थित एकाही आमदाराने याबाबत आक्षेप किंवा विरोध नोंदवला नाही. खडकवासला धरण साखळी सोडून इतर कोठेही धरणात पुरेसे पाणी नसल्यामुळे जलसंपदा खात्याने हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले जात आहे.

पुण्यातील पाणी कपातीच्या निर्णयानंतर सर्व शहरात दिवसातून एकाच वेळी पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुक्त सौरभ राव संध्याकाळी याबाबत पुण्यात आल्यानंतर प्रशासनाची भूमिका अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

Related posts

“सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येईल मी सांगितलं होतं”,राऊतांचा गौफ्यस्फोट

News Desk

नोटा बंदीच्या काळात जिल्हा बँकेचे १०१ कोटी बुडाले, पवारांनी दाखवले पत्र

News Desk

साकीनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून २० लाखांची मदत जाहीर!

News Desk