HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, राऊतांचा आरोप

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने संभाजीराजेंना फसवून धनाट्य उमेदवार दिला आहे, असे राऊतांनी आज (३० मे) माध्यमांशी बोलताना म्हणाले. भाजपने राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्यावर राऊतांनी त्यांच्यावर टीका केली.  राऊतांनी संभाजीराजे छत्रपती, काँग्रेस राज्यसभा उमेदवारांवरून सुरू असलेले नाराजी नाट्य, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठीसोबत चांगले संबंध आदी मुद्यावर माध्यमांशी बोलत होते. 

राऊत म्हणाले, “संभाजीराजे छत्रपतींना कशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न करत होते. हे यातून स्पष्ट झाले आहे. भाजपला स्वत:चा उमेदवार द्याचाच होता. भाजपवाल्यांना घोडेबाजार करायचाच आहे. यासाठी संभाजीराजे छत्रपती यांची ढाल करण्याचा प्रयत्न झाला. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा पद्धतीच्या निवडणुका लढणार असतील. तर सरकारचे सुद्धा या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष आहे,” असे ते म्हणाले. राऊत पुढे म्हणाले, “आम्ही आमचा उमेदवार संजय पवार उतरविला आहे. आणि मला आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण खातरी आहे. राज्यसभेत विजय होण्यासाठी जेवढ्या मतांची गरज आहे. त्या मतांचा कोटा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील. महाविकासआघाडी अजून दोन उमेदवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीही विजयी होतील. महाविकासआघआडीचे चारही उमेदवार विजयी होतील.” 

काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांवरून अंतर्गत नाराजी दिसून येत आहे. राऊत म्हणाले, काँग्रेसच्या अंतर्गत नाराजी विषयी मी काही बोलू इच्छित नाही, माझ्यापर्यंत कोणी काही येणार नाही. कोणत्या विषयी नाराजी आहे हा त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेता त्यांच्यात फोनवरून नेहमीच चर्चा सुरू होती. जर काही मोठी गोष्टी असते. तर मुख्यमंत्री फोन करून सोनिया गांधी बोलतात. दिल्लीतील काँग्रेसचे पक्षश्रेष्ठींनी आणि मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध आहे. मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला जात आहे का?, या पत्रकरांच्या प्रश्नावर बोलताना ते राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे असे नेता आहे त्यांच्यावर दबाव तंत्र चालत नाही.

काँग्रेसने जर स्थानिक उमेदवार असता तर पक्षाला अधिक बळकटी मिळाली असती

काँग्रेसमध्ये ज्यांना उमेदवारी दिली नाराजी नाट्य सुरू आहे, यावर राऊत म्हणाले, “सध्या काँग्रेसची देशभरात जी स्थिती आहे. काँग्रेस खूप कमी लोकांना राज्यसभेत पाठवू शकते. काँग्रेस पक्षाने जी व्यवस्था करायची गरज आहे ती झाली पाहिजे. महाराष्ट्रातून काँग्रेसकडून इमरान प्रतापगडी आहे. हे खूप चांगले शायर आहेत. हे काँग्रेसची निवड आहे याबद्दल आपण काय बोलू शकतो. काँग्रेसने त्यांचे प्रमुख लोकांची देशभरातून जिथे जिथे सोय करता येईल. तिथे काँग्रेस सोय लावली आहे. महाराष्ट्रातून कोणी स्थानिक उमेदवार असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती. पण, मला काँग्रेसने राष्ट्रीय स्थराचा विजार केला असता. इतर राज्यांचा विचार केलेला दिसत आहे. संसदेत भाजप सरकारला प्रतिवृत्त देणार त्यांच्या नजरेत असू शकता. त्यांच्या दृष्टीने काही लोक त्या दृष्टीने त्यांनी अभ्यास केलेला असावा. हा काँग्रेस पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे की त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी. यामुळे शिवसेनेने त्यावर मत व्यक्त करणे चुकीचे आहे.” काँग्रेसची वारंवार नाराजी दिसून येते यावर राऊत म्हणाले, ” मुख्यमंत्री सक्षम आहेत. या महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण  आणि नाना पटोले यांच्यासारखे आदी नेत्यांशी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. जर तुम्ही निधी प्रकरणात म्हणाल तर शिवसेनेचे आमदार सुद्धा नाराज असतात. यावर मुख्यमंत्री मार्ग काढू शकतात.”

  

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हिरकणी’ला सिनेमागृह न मिळाल्यास पुन्हा एकदा ‘खळ्ळ खट्याक्’

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी हसन मुश्रीफांनी देशाची माफी मागावी, भाजपची मागणी

News Desk

‘आजपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरु’, काय आहे नियमावली?

News Desk