HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !

मुंबई | महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. असल्याचा राज्यात सत्ता स्थापनेत अपक्ष आमदारांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. राऊत पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस शिवसेनेचे संख्याबळात वाढ होत आहे.

“दिलेला शब्द का पाळात नाही? असे म्हणत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. कोण खोटे बोलत हे सर्वांना माहिती असल्याचे सूचक विधान राऊता पत्रकारांशी बोलताना केले. शिवसेनेच्या हक्कासाठी संघर्ष सुरू असल्याचे देखील राऊतांनी सांगितले.” शरद पवारांशी बोलणे हा काही अपराध नाही?, असा उलट सवाल करत राऊतांनी केला. राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार मुख्यमंत्री होणार नाही.

शिवसेनेने प्रस्ताव पाठविला नाही या शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेनेने वेट अँन्ड वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची माझं बोलणे झाले. शरद पवारांना भेटलो, बोललो तर गुन्हा आहे का? ज्यांना पवारांशी बोलण्याचा पोटशुळ उठला आहे. तेदेखील त्यांच्याशी कसा संपर्क साधतात हे आम्हाला माहित नाही. मुख्यमंत्र्यांचा शपथग्रहण होऊन महाराष्ट्रातील ग्रहण सुटणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

तरुण भारतच्या अग्रलेखावर राऊतांची टीका

महाराष्ट्राचा राजकीय चेहरा बदलेल हे दिसेल. न्याय आणि अधिकारासाठी सत्याची लढाई आहे. विजय आमचा होईल. महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री होईल जे पाहून जनता नक्कीच बोलेल महाराष्ट्राचा चेहरा बदलला असे सांगत तरुण भारतच्या अग्रलेखावर राऊतांनी निशाणा साधला आहे. टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच, मी माझ्या पक्षाची भूमिका समोर मांडतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

News Desk

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या सर्व अडचणी व समस्या सोडविण्यास प्राधान्य ! – गृहमंत्री

News Desk

शरद पवारांनी मला पक्षात घेतले नसते तर मी बाद झालो असतो –  एकनाथ खडसे

News Desk