HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील !

मुंबई | महाविकासआघाडी सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे ओरड विरोधकांनी केली. यावर विरोधाकांनी महाराष्ट्र बचाओ आंदोलन देखली केले. या सर्व परिस्थितीवर शिवसेनेचे खासदर संजय राऊत यांनी ट्वीट करत विरोधकांवर टीका केली आहे. “करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है,” असे संजय राऊतांनी आज (२६ मे) ट्विट करून भाजवप निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, “करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे.. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील . Boomerang… जय महाराष्ट्र.” तसेत राऊत यांनी आज सकाळी कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी, असे ट्वीट करत भाजपवर टीका केली होती. “मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!” असे राऊत यांनी ट्वीट केले आहे.

संबंधित बातम्या

महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे का ? संजय राऊत म्हणतात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधींनी २२ मे रोजी बोलावली सर्व विरोधी पक्षांची बैठक

News Desk

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच !

News Desk

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk