HW News Marathi
महाराष्ट्र

मी वापरलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ सर्व शब्दकोशात उपलब्ध!

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याप्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती यांनी त्यांच्यावर FIR दाखल केला आहे. या प्रकरणी पत्रकारांनी राऊतांना विचारल्यार राऊत म्हणाले, “मी मधल्या काळात एका शब्दाचा वापर केला. तो शब्द म्हणे भावना दुखवणार आहे. काय भावना दुखल्या, कोणाला मुर्ख म्हणे, अशिक्षित आणि आडाणी म्हणे, हे वारंवार आपण राजकाणात आणि समाजकारणात वापरतो. मी जो शब्द वापरला तो या देशातला नव्हते तर जगातल्या कोणत्याही शब्दकोशात आपण त्याचा अर्थ पाहिला तर त्यांचा अर्थ मुर्ख, अतिशाहणा आणि बुद्ध असा दिलेला आहे. जर या शब्दा विरोधात अशा प्रकारे तर या देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही.”

राऊत म्हणाले, “माझ्याकडे ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना सरकार पाठवू शकत नाही. म्हणून बहुतेक त्यांनी नव्याने हा गुन्हा दाखल करून संसदेचे अधिवेशन सुरू असताना. एका खासदारावर अशा प्रकारे गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी आमच्यावर असे किती गुन्हे दाखल केले. तरी आम्ही सत्य बोलण्याचे थांबणार नाही. जे सत्य आहे ते आम्ही बोलणारच बघू पाहू.”

गोव्यात आघाडी झाली तर स्वागत नाही तर स्वातंत्र लढू

महाराष्ट्रप्रमाणे गोव्यातही भाजपविरोधात आघाडी होणार आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना केल्यानतंर ते म्हणाले, “यासंदर्भात प्राथमिक अवस्थेत चर्चा सुरू आहे. काही लोकांशी नक्कीच चर्चा झाली. पण प्रत्येक पक्षाला वेळ त्यावा लागतो. त्या राज्यात अशा प्रकारच्या आघाड्या करायच्या त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते. ती प्रक्रिया थोडी मोठी असते. पण जर झाली अशी आघाडी तर त्यांचे स्वागत आहे. जर नाही आम्ही स्वातंत्रपणे लढू. आम्ही आधीच सांगितेल आहे की, आम्ही २२ जागांवर गोव्यात लढणार आहोत, आणि लढू. ठिका आहे.” “कोणी कुठली स्वप्न पाहू नये. २०१४ ला मोदी पंतप्रधान होतील असे कोणाला वाटले नव्हते. इतकेच मी सांगू शकतो. राजकारण हे फार चंचल आहे. या देशातील लोकशाही अत्यंत चंचल आहे. आणि या देशातील जनता शहानी आहे. इतकेच मी सांगेन.”

नेमके काय आहे प्रकरण

संसदेत १२ खासदारांचे निलंबन केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे निदर्शन करत होते. तेव्हा शरद पवारांना राऊतांनी खुर्ची आणू दिली. यानंतर भाजपने राऊतांवर टीका करण्यास सुरूवात केली. यानंतर राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित भाजपवर टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी भाजपच्या लोकांना उद्देशून ***गिरी हा शब्द वापरला. राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही म्हणावे त्यांना बरे का?, ***गिरी बंद करा, ही ***गिरी बंद करा, परत सांतोय. अशाने तुमचे राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. ही कृती आहे, तुमच्या डोक्यातील कचरा आहे. हा कचरा तुम्ही साफ केला नाहीत. एखाद्या डंम्पिंग ग्राऊंडमध्ये तुम्हाला गाडून टाकतील. शिवसेना हा पक्ष काँग्रेसमध्येच विलीन करून टाकावा, यूपीएत जाण्यापेक्षा, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, “मी म्हणालो ना ही ***गिरी आहे. वेडे आहेत ते मी काल म्हटले ना त्यांच्या सगळ्याची प्रकृती बिघडली. मासिक आजार लागलेत सगळ्यांना उलट मी एनसीबीला पण सांगेन तुम्ही जरा यांची रक्त चाचणी करून घ्या, असे राऊत म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

News Desk

राज्यात वीज पडून नऊ जण ठार

News Desk

“मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

News Desk