HW News Marathi
महाराष्ट्र

BharatBandh | शिवसेना बंदात सहभागी झाली नाही, तरी देखील बंद यशस्वी | अशोक चव्हाण

मुंबई | पेट्रोल-डिझेल आणि घरगुती दरवाढीला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आज (१० सप्टेंबर) रोजी संपुर्ण देशात भारत बंदची हाक दिली होती. भारत बंदला २१ प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला होता. मुंबईत शिवसेना बंदात सहभागी झाली नाही, तरी बंद यशस्वी होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

भारत बंद मागे घेतल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई पत्रकार परिषदे घेतली. सरकार चालवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. जे दरवाढ रोखू शकत नाहीत, ते सामान्यांचे प्रश्न कसे सोडवतील, असा सवाल अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उभा केला.

मुंबईतील बंद यशस्वी

मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह २१ प्रादेशिक पक्षांनी या बंदाला पाठिंबा दिला. या सर्व पक्षांच्या पाठिंब्याने बंद यशस्वी झाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदात सहभागी झाले. या बंदादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कुठल्याही प्रकराची हिंसा झाली नसल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

शिवसेना सत्तेसाठी लाचार

काँग्रेसने पुकारलेल्या बंदात २१ प्रादेशिक पक्षांनी पाठिंब्यासोबद बंदात सहभागी झाले. शिवसेना ही सत्तेसाठी लाचार असून त्यांचा खरा चेहरा आतासमोर आला आहे. मात्र शिवसेना बंदात सहभाग झाली नाही. यावरून सेनेचा खरा चेहरा समोर आल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर महापालिका कुणाच्या नेतृत्वात लढणार? पवार घेणार निर्णय

News Desk

माझ्या घरावर मोठा हल्ला, ही दुर्दैवी घटना; ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Aprna

“…वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Aprna