HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेता रितेश देशमुखवर शिवप्रेमी नाराज 

मुंबई | महाराष्ट्रातील शिवप्रेमीचे श्रद्धा स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्यावर मेघडंबरीत फोटो सेशन केल्यामुळे अभिनेता रितेश देशमुखवर सोशल माध्यमांवर टीका केली जात आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीमुळे शिवभक्त दोघांवर चांगलेच संतापले आहेत. त्यामुळेच रितेशने ट्विट केलेले फोटो डिलीट केले आहेत. टीकेचा सामना करावा लागल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखनं शिवप्रेमींनी माफी मागितली आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात रितेश महाराजांची भूमिका साकारत असल्याचे समजते. या निमित्ताने या टीमने काल रायगडाला भेट दिली. यावेळी अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पानीपतकार विश्वास पाटील यांचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केले. रितेशने ट्विटरवर रायगड भेटीचे तीन फोटो ट्विट केले. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी टीकास्त्र सोडल्यावर रितेश देशमुखनं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवभक्तांची माफी मागितली. रितेश हे फोटो ट्विटरवरून काढून टाकले आहेत. महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे केवळ भक्तीभाव होता. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र तरीही आमच्या कृत्यामुळे कोणी दुखावलं असल्यास आम्ही त्यांची माफी मागतो, असे रितेश देशमुखने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘मंदा म्हात्रेंच्या विधानावर आता चंद्रकांत पाटलांचं उत्तर! म्हणाले….’

News Desk

#MaharashtraElections2019 : पहिल्या २ तासातील मतदानाची टक्केवारी

News Desk

रश्मी ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांतील व्यवहाराबद्दल अन्वय नाईकांच्या मुलीने केला ‘हा’ खुलासा 

News Desk
मुंबई

जुहू चौपाटीवर बुडालेल्या पाच जणांपैकी २ तरुणांचा मृत्यू

News Desk

मुंबई | जुहू समुद्र किनाऱ्यारवरील गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटी गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ५ तरुण बुडाल्याची घटना घडली होती. यात दोघांचा मृत्यू झाला असून वसीम खान (२२) तरुणाला वाचवण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. तर २ जण बेपत्ता तरुणांचा अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस यांचा शोध घेत आहेत.

 

अंधेरी पश्चिम हा फरदिन सौदागर (१७), सोहेल शकील खान (१७), फैसल शेख (१७), नाझीर गाझी (१७), आणि वसीम सलीम खान (२२) ही जुहू चौपाटीवर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यावेळी समुद्राला भरती असल्याने ते पाचही जण बुडाले.

Related posts

पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड

News Desk

मुंबईला पावसाने झोडपले

News Desk

शेअर बाजारात मोठी घसरण

swarit