HW News Marathi
मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्माराकावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची कोल्हेकुई सुरु

मुंबई | भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार अरबी समुद्रामध्ये होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे आंतराष्ट्रीय दर्जाचेच होणार असून त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या सरकारने मिळविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात आणि मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचे राज्यात सरकार आल्यानंतर सर्व परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करून स्माराकासाठीचा सल्लागार व कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया ही पूर्ण होत आली आहे. आघाडी सरकारने 15 वर्षात जे केले नाही ते भाजपा सरकारने 900 दिवसात केले.

अश्या वेळी आपल्या हाताला काही लागत नाही म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आता कोल्हेकुई करत आहेत. यांनी १९९९ ला स्मारकाची घोषणा केली त्यानंतर २००१ ला यांचे सरकार आले. २०१४ पर्यंत त्यांचे सरकार असताना काहीच केले नाही. आता स्मारकाबाबत नाहक वाद निर्माण करून स्मारकाला उशीर तर करण्याचा प्रयंत्न काँग्रेस राष्ट्रवादी कडून केला जात नाही ना? अश्या शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी विरोधकांच्या आरोपाला माध्यमांशी बोलताना सडेतोड प्रतिउत्तर दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंवर नेतेपदाची जबाबदारी

News Desk

पोटच्या लेकीला धरणात फेकले

News Desk

वांद्रे येथे इमारत कोसळली, १६ जण जखमी तर दुर्घटनाग्रस्तांना शासनाने मदत करण्याची शेलारांची मागणी

swarit