HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ‘हल्ला बोल’ यात्रेचा चौथा आणि शेवटचा टप्पा सध्या सुरू आहे. ‘शिवसेना आता शिवसेना नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदासाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे.

वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते. मात्र, राजीनामे खिशातून बाहेर निघत नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शिवसेनेवर केली आहे.

९ एप्रिल रोजी हल्ला बोल यात्रेचा आठवा दिवस असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हात या हल्ला बोल यात्रेला सुरु झाली आहे. पाटण तालुक्यात हल्ला बोल यात्रेला सुरुवात करण्याआधी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रिती संगम या स्मृतिस्थळाला अभिवादन करुन पश्चिम महाराष्ट्राच्या हल्ला बोल यात्रेला सुरुवात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत भाजप नेत्याची अवहेलना

News Desk

“खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही”, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया 

News Desk

अजिदादांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचं हे कारस्थान!

News Desk
महाराष्ट्र

अहमदनगर शहरातील राजकीय गुंडगिरी रोखणार कोण ?

News Desk

अहमदनगर | राजकीय नेत्यांमुळे ते गुंडाचे माहेरघर झाले आहे. बिहार, उत्तरप्रदेशपेक्षा येथील गुंडगिरी घातक आहे. राजकीय नेत्यांनी आपले प्रस्थ टिकवण्यासाठी गल्लोगल्ली गुंडांच्या टोळ्या तयार केल्या आहेत. त्यांना पोसण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते.

हॉटेले, ढाब्यासह काही अैवध धंदे सुरू करून तरुणांना या कामी जुंपले जाते. त्यातून आलेल्या पैशातून हे पोसलेले गुंड निरापराध लोकांची हत्या करतात. नगर जिल्ह्यातील भानुदास कोतकर या सराईत गुन्हेगाराने अनेक निरापराध लोकांचे बळी घेतले आहेत.

परंतु सुस्थावलेल्या पोलिस यंत्रणेने आपले कार्य तत्पर केले नाही. परिणाम त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पैशाच्या जोरावर आपण कुणावरही मात करू, या भ्रमात हे गुंड मंडळी नको ते कृत्य करत आहे. शेवगाव तालुक्यातील लांडे खून प्रकरणामुळे कोतकर कुटुंबिय जेलमध्ये असेल तरी त्यांचा वारस चालवण्याचे काम त्यांचे नातेवाईक करत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या खून प्रकरणामुळे ते प्रकर्षाने जाणवले.

कोतकरांचे व्याही व इतर नातेवाईक त्यांचा वारसा चालवत आहेत. त्यातूनच त्यांना काल खून प्रकरणात अटक झाली आहे. गुंडांना पोसण्यात या नेत्यांचा हात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यांचा बिमोड करण्यासाठी सिंघम अधिकाऱ्याची गरज आहे. परंतु अधिकारी विकले जात असल्याने हे गुंड मोकाट राहतात.

नगर जिल्ह्यातील माध्यमांमध्ये या गुंडाचा धाक आहे. पेपर किंवा वाहिनीवर संबंधित गुंडाचे छायाचित्र छापून आले तरी संबंधित छायाचित्रकारास किंवा पत्रकारास धमकी दिली जाते. हे थांबवण्यासाठी सरकारने तीन आमदारांवर गुन्हे दाखल करून त्यातील दोघांना अटक केली असली त्यांना जामिन मिळणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

Related posts

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची आज जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेत बैठक 

News Desk

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा! – देवेंद्र फडणवीस

Aprna

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Aprna