HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहाणार नाही | संजय राऊत 

मुंबई | “मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. प्रॉमिस. जय हिंद, जय महाराष्ट्र”, असे ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. “मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय. कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवून दाखवा”, अशा शब्दात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटरवर खुले आव्हान दिल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई पोलीस आणि मुंबईबद्दल केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर कंगनाविषयी सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत होत आहे.

मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा !

“अनेक जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत. म्हणूनच येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता येईल याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”, अशा शब्दांत कंगनाने आव्हान दिले आहे. कंगनाच्या या आव्हानाला प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. कंगनाच्या या ट्विटनंतर प्रताप सरनाईकांनी देखील त्यावर आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवारांची ‘ती’ भूमिका व्यक्तिगत, आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास !

News Desk

अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई आणीबीणीसारखी, केंद्राची राज्य सरकारवर टीका

News Desk

“सीबीआय, ईडीच्या तलवारी उपसून भय निर्माण करणारे केंद्र अशा वेळी पळपुटेपणा दाखवते”

News Desk