HW News Marathi
Covid-19

…नाहीतर मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल !

नवी दिल्ली । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. तसेच, “मोदी आणि शाह यांना स्वत:ला बदलावे लागेल”, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे. “पश्चिम बंगालच्या जनतेला जय श्रीरामचा नारा आणि धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते. प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार आणि बदनामी ही शस्त्र आता जुनाट आणि बोथट झाली. याच न्यायाने उद्या श्री मोदी आणि शाहांच्या प्रतिमांना गंज चढेल. ते होऊ द्यायचं नसेल, तर त्यांना स्वत:ला बदलावे लागेल!” असे संजय राऊत यांनी आपल्या सदरात लिहिले आहे.

‘खेला होबे’ने धुमाकूळ घातला !

“पश्चिम बंगालात ‘जय श्रीराम’चे आकर्षण कधीच नव्हते. तिथे दुर्गा किंवा कालिमातेचे वलय. भाजपाने श्रीरामास प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर आणले. पण देवांशू भट्टाचार्य या फक्त २५ वर्षांच्या तरुणाने ‘खेला होबे’ हे गीत तृणमूलसाठी प्रचारात आणले. त्या ‘खेला होबे’ ने ‘जय श्रीराम’च्या नारेबाजीवर मात केली. खेला होबे म्हणजे आता खेळ होईल. ‘खेला होबे’ने संपूर्ण पश्चिम बंगालात धुमाकूळ घातला”, असे म्हणत संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचे देखील कौतुक केले आहे.

ममता बॅनर्जींची अहिल्याबाई होळकरांशी तुलना

“ही विधवा बाई काय राज्य करणार? असं म्हणणाऱ्या दरबारी मंडळींचा प्रमुख गंगोबा तात्या यानं राघोबा दादांशी संधान बांधलं. राघोबा दादा इंदूरवर चालून गेले. अहिल्याबाईंचा आपल्यासमोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकून घेऊ असा त्यांना विश्वास होता. अहिल्याबाईंनी राघोबादादांना निरोप पाठवला की तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हरलात तर काय होईल. मी बाईमाणूस असल्याने मला कुणी हसणार नाही. पण तुमचा पराभव झाला तर जगास तोंड दाखवायला जागा राहणार नाही. राघोबा दादांना हा निरोप मिळताच त्यांनी मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली. पश्चिम बंगालमध्ये याहून वेगळं काय घडलं?”, असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या लेखात ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्याबाई होळकरांशी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार

News Desk

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

News Desk

राज्यात आज ३३०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर १३१५ जणांना डिस्चार्ज

News Desk