HW News Marathi
Covid-19

काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही, पण…!

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय राजकारणातील काँग्रेसच्या कामगिरीबाबत भाष्य केले आहे. देशात नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमधील काँग्रेसचा सहभाग आणि कामगिरी याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावर संजय राऊत यांनी आज (९ मे) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, “तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी या देशात विरोधीपक्षाची भक्कम आघाडी उभी करावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे. निश्चित या आघाडीचा आत्मा काँग्रेस पक्षच आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

कालच शरद पवारांशी माझी, लवकरच हालचाली सुरु होतील !

नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणूक आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस पक्षाला आसाममध्ये चांगलं यश मिळालं आहे. पण सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आलंय. पण काँग्रेसने अजून मोठी मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे. या देशाला उत्तम आघाडीची गरज आहे. महाराष्ट्रात जशी महाविकास आघाडी काम करत आहे, ती एक आदर्श आघाडी आहे. तशीच आघाडी देशपातळीवर असावी. या विषयावर कालच शरद पवार यांच्याशी माझी चर्चा झाली. लवकरच याबाबत हालचाली सुरु होतील,” असेही संकेत यावेळी संजय राऊत यांनी दिले आहेत.

महाविकासआघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी !

केंद्रीय पातळीवरच्या आघाडीच्या नव्या नेतृत्वाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मी असं कुठे म्हणालो की आघाडीला नवं नेतृत्व हवं ? तो निर्णय एकत्र बसून घ्यायला हवा. प्रत्येकाला वाटत असतं की मीच नेता आहे. पण तसं होत नसतं. आघाडी अशीच निर्माण होत नाही. आता महाराष्ट्रात तीन पक्षांनी उद्धव ठाकरे यांना नेता केलं आणि सरकार उत्तम चाललंय. राज्यातील महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. आपण ते निर्माण केलंय. राष्ट्रीय स्तरावर देखील अशी नवीन व्यवस्था निर्माण करावी. सगळ्यांनी एकत्र यावं, असं मत मी व्यक्त केलं आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्यायला भाग पाडू नका! – अजित पवार

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना लस

News Desk

गणेशमूर्तींची उंची ४ फुटापर्यंतचं ! मुर्तीची उंची नव्हे भक्ती महत्वाची …

Arati More