HW News Marathi
देश / विदेश

ठाकरे संकटात सापडले की शत्रूला अधिक घातक ठरतात ! संजय राऊतांचा इशारा

मुंबई । संकटात सापडलेले ठाकरे काय करतात? त्याबाबत सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना रोखठोक इशारा दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी हा इशारा दिला आहे. “ठाकरे घराण्यातील लोक संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता अधिक उफाळून येते. ते शत्रूला अधिक घातक ठरतात”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ह्याचसोबत यावेळी संजय राऊत यांनी राजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा यातील फरकही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, अयोध्येतील जमीन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला म्हणून भाजपचे नेते शिवसेनेला हिंदुद्रोही आणि राजद्रोही ठरवत आहेत. ही एकप्रकारची विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही, देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे”, असेही संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं

राष्ट्रनिष्ठा काय असते हे समजावून सांगताना संजय राऊत यांनी फ्रान्सचे लष्करी अधिकारी द गॉल यांचा दाखला दिला आहे. “द गॉल हे एक मानी स्वभावाचे गृहस्थ होते. दुसऱ्य़ा महायुद्ध काळात त्यांच्या सत्यवादाचा कस लागला. हिटलरच्या संभाव्य हल्ल्याच्या प्रतिकारार्थ तेव्हाच्या फ्रेंच सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून मॅजिनो तटबंदी उभारली. ही तटबंदी अभेद्य आहे, असा डंका फ्रेंच सरकारी तज्ञ पिटत असतानाच द गॉलने एक पुस्तक लिहून मॅजिनो तटबंदी कशी कुचकामी आहे हे पुराव्यासह दाखवून दिले. फ्रेंच सरकार व लष्करी अधिकारी द गॉलवर भडकले व तो देशनिष्ठ नसल्याचा अपप्रचार सुरू केला, पण द गॉलचेच म्हणणे शंभर टक्के बरोबर होते. याचा अनुभव फ्रान्सने लगेच घेतला. जर्मन फौजांनी स्वारी केली. मॅजिनो तटबंदी जर्मन फौजेला चार दिवसही रोखू शकली नाही. द गॉलने सत्य सांगितले यापेक्षा राष्ट्रनिष्ठा दुसरी कोणती असू शकते? जर्मन सेनापती जनरल रोमेलविषयी अशी ख्याती होती की, तो अडचणीत सापडला की शत्रूला अधिक घातक ठरे. काही व्यक्तीचे रसायनच असे असते की संकट काळात त्यांची गुणवत्ता आणि राष्ट्रनिष्ठा उसळून येते. टिळक, गांधी, चर्चिल, सावरकर, ठाकरे ही या वर्गातील माणसे. द गॉल यांचा वर्ग तोच”, असे संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

४८ तासांसाठी इंटरनेट सेवा राहणार बंद ?

News Desk

कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, अभिनेत्री आता या प्रकल्पाची असणार ब्रँड अ‍ॅम्बेसिडर!

News Desk

भारतीय रुपयाची घसरण सुरूच

Gauri Tilekar