HW News Marathi
महाराष्ट्र

“रझा अकादमीची एवढी ताकद नाही, यामागे वेगळेच लोक!”

मुंबई | रझा अकादमीची एवढी ताकद नाही, त्याच्यामागे वेगळेच लोक आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. त्रिपुरातील हिंसचारच्या निषेधार्थ राज्यातील अमरावतीत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पोलिसांवर दगडफेक झाली होती. या पार्श्वभूमीवर अमरावतीत बंद आज (१३ नोव्हेंबर) पुकारला होता. मात्र, अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण आले.

महाराष्ट्र अस्थिर करण्याचं मोठे कारस्थान असून भाजप द्वेष पसरवित असून धार्मक दंगलींचे घडवल्याशिवाय भाजप राजकारण करू शकणार नाही, अशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे. राज्यात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यातून राज्यात अस्थिर होत नसेल. तर राज्यात दंगलीचे कारस्थान करायचं, असे राऊत म्हणालं. ज्या लोकांनी दंगल घडवणारं पडलं जातील. या सर्वांचं चेहऱ्यावरचा मुखवटा ओढला जाईल आणि खरे चेहरे देखील लवकरच उघडे होती, असे राऊत म्हणालं.

नेमके काय आहे प्रकरण

त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित हिंसाचार पार्श्वभूमीवर राज्यात विरोध दर्शविणारी रॅली काल ( १२ नोव्हेंबर) काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणींनी दुकानांची तोडफोड केली तर काही दुकानं जबरदस्तीने बंद करण्यात आली. राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती या ठिकाणी रॅलीला हिंसक वळण आलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दहीहंडीला मान्यता द्यायची नव्हती मग बैठक कशाला?”, बाळा नांदगावकरांचा सवाल

News Desk

भाजपविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ED सारख्या यंत्रणांचा गैरवापर! – नाना पटोले

Aprna

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या ६५० कोटीच्या निधीस मंजुरी – अजित पवार

Aprna