HW News Marathi
Covid-19

श्रमिकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत आपापल्या राज्यांत पोहोचवले जात आहे

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आता तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. दरम्यान, देशातील अनेक राज्यांत, जिल्ह्यांत अडकलेल्या श्रमिकांसाठी रेल्वे आणि सरकारने पुढाकार घेत विशेष ट्रेन सुरु करत त्यांना आपापल्या गावी जाण्याची सोय ही करुन देण्यात आली आहे.

या सगळ्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या श्रमिकांना त्यांच्या ठिकाणावर सोडल्यानंतर ही ट्रेन रिकामीच परत येत आहेत तसेच, या सर्व श्रमिकांना मोफत अन्न आणि पाणीही देण्यात येत आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे सोशल डिस्टन्स पाळतच प्रवाशांना रेल्वेत बसवले जात असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत देशातून या श्रमिकांसाठी ३४ विशेष ट्रेन या सोडण्यात आल्या आहेत. या सर्व श्रमिकांना सामाजिक बांधितलकी जपत आपापल्या राज्यांत, जिल्ह्यांत सोडले जात आहे. देशात सध्या कोरोनाच्या संकटाने या श्रमिकांचे होणारे हाल लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ३७२१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर १९६२ जणांची कोरोनावर मात

News Desk

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे !

News Desk

गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावंस वाटलं, पण…! अजित पवारांची नाराजी

News Desk