HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! १०वी-१२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षा गायकवाडांची घोषणा 

मुंबई | राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या १०वी आणि १२वीच्या विद्यार्थांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १०वी आणि १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. आता १२वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर १०वीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी १०वी आणि १२वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आधी १०वी-१२ वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार होत्या. १०वीची परीक्षा २९ एप्रिलला तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिलला होणार होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी ९वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पुढील वर्गात प्रमोट करण्यात आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk

कोरोना काळातील विजबिले कमी करण्याची मुंबई भाजपची मागणी

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड

Aprna