HW News Marathi
महाराष्ट्र

आता देवेंद्र फडणवीस जयंत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार?

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १७ एप्रिलला होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीत ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस आणखीच वाढली आहे. दरम्यान, राजकारणात सध्या ‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्दप्रयोग चांगलाच गाजत आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्याच तयारीत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना शब्द देत पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम करु असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा पलटवार आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरात आज (१२ एप्रिल) सभा घेताना दिले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

कोरोना काळातील अपयशाचं खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. तसेच, ‘कमळाचं बटन दाबून समाधान आवताडेंना विधानसभेत पाठवा, बाकीचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,’ असं सूचक विधान करून पुन्हा एकदा सत्तापालटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जयंत पाटलांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तृळात जोरदार रंगली आहे.

काय म्हणाले होते जयंत पाटील?

“पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो”, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील पंढरपुरात होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.

पंढरपूर-मंगळवेढा ही पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. भाजपाने परिचारक गट व आवताडे गटाचे मनोमिलन केल्यामूळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणूकीत रंग भरले आहेत.

याआधी सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला होता. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला होता. इतकंच नाही तर जळगावातील महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधाक कारवाई होणार !

News Desk

अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायलाच हवा! राज ठाकरेही आक्रमक

News Desk

वनविकास महामंडळाने मोठी झेप घ्यावी! – सुधीर मुनगंटीवार

Aprna