HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन!


मुंबई। एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण देखील ढवळून निघालंय. आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानावर भाजपचे गोपीचंद पडळकर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. अशावेळी मात्र परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचा आवाहन करतात तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून असेही म्हटले जाते एसटी कर्मचाऱ्यांना भाजपकडून चिथावणी दिली जाते. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून देखील आता एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून काय आवाहन केलं पाहूया जशास तसं…..

नम्र आवाहन

कर्मचारी बंधु भगिनींनो …

कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठया आर्थिक संकटात सापडली आहे . संप करुन तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका . सध्या एसटीचा संचित तोटा १२००० कोटी रुपया पर्यंत पोहचलेला आहे . असे असतांना देखील , सर्व कर्मचा – यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे . अर्थात , त्यासाठी राज्य शासनाकडुन आतापर्यत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे . यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.

कर्मचारी बांधवांनो … आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता ( २८ टक्के ) व घरभाडे भत्ता ( ८,१६,२४ टक्के ) मान्य केल्या आहे . तसेच दिवाळी भेट ही दिली आहे. असे असुन देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे , त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य शासन मा . मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे प्रामाणिकपणे अनुपालन करित आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने आपले कार्य सुरु केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बंधु भगिनींनो … आपण संप मागे घ्यावा यासाठी मा . मुख्यमंत्री महोदय यांनी सुध्दा विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे . अर्थात , संपाचा विपरीत आर्थिक परिणाम संस्था आणि संस्थेचे कर्मचारी म्हणून आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत . संपामुळे गेली कित्येक दिवस सर्व सामान्य प्रवाशी जनतेचे अतोनात हाल होत आहेत . या सर्वांचा विचार करुन आपण तातडीने संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजु व्हावे हीच आपणांस विनंती .

मात्र आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघडतो की थांबतो हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप हा संप यशस्वी करून दाखवतो किंवा अन्य कोणत्याही मार्गाने परिवहन मंत्री एसटी कर्मचाऱ्यांची समजूत काढतात हे देखील येणाऱ्या काही दिवसात समजेलच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांचा ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकला

News Desk

मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडलं म्हणणारे मुर्ख!

Aprna

“राज्यपालांना भेटून १२ आमदारांच्या नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल”, अजित पवारांचा संताप

News Desk