HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मराठवाड्यासाठी आणखी एक दिलासादायक निर्णय !..

मुंबई। निम्न पैनगंगा धरणातून १६७.४६ टीएमसी पाणी वापर करण्यास दिलेल्या निर्णयाच्या माध्यमातून मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडी करत असून मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात राज्यसरकारच्या जलसंपदा विभागामार्फत केल्या जातील असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे तथापि आंध्रप्रदेशशी झालेल्या विविध बैठकांमध्ये पैनगंगेत ११७.८७ टीएमसी पाणी आहे असे गृहीत धरून चर्चा केली जात होती. अलीकडेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडून मान्यता

जलविज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध होते म्हणून संपूर्ण १६७.४६ टीएमसी पाणी वापर करण्यास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मान्यता दिली. या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यात प्राधान्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तुट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर, नियोजन पुस, अरूणावती व उर्ध्व पैनगंगा या प्रकल्पांच्या खालील भागात प्राधान्याने करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार, उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगामधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहे.

भागवत कराड यांची माहिती

तर दुसरीकडे आता ग्रीन एनर्जी निर्माण करण्यावर विविध देश भर देत आहेत. यात भारतानेही आणखी पुढाकार घेत औरंगाबादच्या प्रसिद्ध जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट उभारण्याची योजना आखली जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणावर तरंगणारा सौर प्रकल्प उभारण्याविषयी केंद्र आणि राज्यांतील संबंधित मंत्र्यांची लवकरच बैठक होईल, अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादमध्ये बोलताना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रात्री कोरोना असतो का? मनसेच्या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ED ने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त दुकानदारांना दिला दिलासा, म्हणाले…

News Desk