HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही !

मुंबई | “एखाद्या समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रश्नावर जेव्हा सत्ताधारी पक्षाकडून तो प्रश्न विचारण्यापूर्वीच ज्या पद्धतीने गोंधळ घालण्यात आला. त्यावरुन फडणवीस सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही हे स्पष्ट होते” असे विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविल्यानंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाने सभागृहात गोंधळ घालत त्यावर चर्चाच होऊ दिली नाही.

“फडणवीस सरकार भ्रष्टाचारावर चर्चा करायलाच तयार नाही. प्रश्नोत्ताराच्या तासाला पहिला प्रश्न हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा होता. मात्र, तो प्रश्न चर्चिला जाऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. त्यामुळे दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले”, असे धनंजय मुंडे म्हणाले. २०७ नियमान्वये धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चिला जाणार होता. मात्र, या ही चर्चाच होऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल!

News Desk

“अदार पूनावालांनी मागितली नसून त्यांना सुरक्षा कशासाठी?,” नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

News Desk

मुख्यमंत्री एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल, शस्त्रक्रियेची शक्यता

News Desk