HW News Marathi
महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!” – जयंत पाटील

मुंबई | राज्यात महाविकासआघाडी सरकारने नुकतेच २ वर्षेपूर्ण झाली आहे. पण महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक वारंवार सरकार पाडणार असल्याचे बोलत आहेत. मला मुख्यमंत्री असल्यासारखे वाटत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावत म्हणाले, फडणवीसांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा गेली नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले असल्याचे ते म्हटले.

राज्यात येत्या काही काळात महापालिका निवडणुका येवून ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारी करण्यासाठी जयंत पाटलांना पुण्यात पाठविले आहे. पाटील म्हणाले, “फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याची कुठलीही घाई दिसत नाही. मात्र, चंद्रकांत पाटलांच घाई झाल्याची दिसत आहे. फडणवीसांच्या आडून तेच मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.” भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान हे विधान केले होते. पाटलांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्याची इच्छा आहे. पण, मुख्यमंत्री पदाच्या यादीत त्यांचे नाव नाही, असा टोलाही जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. फडणवीसांना जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांच्या मनातील इच्छेचा इशारा दिल्याच्या चर्चा सध्या राज्याचा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजदंड पळवला म्हणून कामकाज थांबणार नाही ! भास्कर जाधवांचा रवी राणांवर निशाणा

Ruchita Chowdhary

कर्जाला कंटाळून यवतमाळच्या शेतक-याची आत्महत्या

News Desk

“एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”, राऊतांचा सवाल

News Desk