HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणुकांचे अंदाज बांधने बंद करा – राज्यमंत्री बच्चु कडू

अमरावती। नुकताच अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांना यश मिळाले आहे. त्याचबरोबर अकोल्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं आहे. या सर्व यशानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये बच्चू कडू यांची चर्चा रंगलेली असतांना आगामी निवडणूकांचे निकाल कसे असतील याचा अंदाज बांधन्यात येत आहेत, मात्र असे अंदाज चुकीचे असतात. जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती यांच्या निकालाचा विधानसभेची काहीएक संबंध नसतो असे बच्चू कडू यांनी व्यक्त केले. या निवडणुका व्यक्तिगत पातळीवर होत असतात पक्षाचा जरी बॅनर असलं तरी याचा या निवडणुकांवर काहीसा फरक पडत नाही असेही बच्चू कडू बोलत होते. त्यामुळे निवडणुका बदलल्या की मतही बदलतात असाही सल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे त्यामुळे असे अंदाज काढणे बंद करा असा टोलाही राज्यमंत्र्यांनी लगावलेला आहे.

सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल आज हाती आलेले आहेत. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेत आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार परिवर्तन पॅनलने सातत्याने केला होता.सहकार पॅनलला13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजून स्थापन व्हायची आहे.राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेतील पुढील राजकारण कसे असेल याचे संकेत दिले आहेत. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ, असे देखील राज्यमंत्री बचू कडू यांनी सांगितले.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल

सहकार पॅनलचे उमेदवार आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप, श्रीकांत गावंडे, सुधाकर भरसाकले यांचा विजय

सहकार पॅनलच्या विरेंद्र जगताप यांना 21 मते

परिवर्तन पॅनलच्या किशोर कडू यांना 9 मते

धामणगाव रेल्वे सेवा सोसायटीमधून सहकार पॅनलच्या श्रीकांत गावंडे यांचा 21 मते घेऊन विजयी, प्रतिस्पर्धी सुनील सिसोदे यांना केवळ 11 मते मिळाली

सहकार पॅनल शेतकऱ्यांसाठी काम करणार

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व उत्तरा जगताप यांच्या वर ED ने नोटीस बजावल्या आहेत असे आरोप करण्यात आले. मात्र, विरोधकांचे सर्व आरोप नाकारत मतदाराणी आम्हाला निवडून दिले आहे. बँकेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली आमचे पॅनल शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे,असं माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवलेंची भूमिका मराठी भाषेविरूद्ध?

News Desk

महाराष्ट्रात जरी आघाडीचं सरकार असलं तरी बाळासाहेब थोरातांना बळकट करायचे आहे, पृथ्वीराज चव्हाणांचे सुचक वक्तव्य

News Desk

आक्रमण म्हणजे अतिरेक ठरु नये, पण…! नाना पटोलेंच्या नियुक्तीनंतर ‘सामना’चे परखड भाष्य

News Desk