HW News Marathi
महाराष्ट्र

अंजली दमनीयांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

मुंबई | “ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. अशा संकटांमध्ये कुटुंबच पाठीशी उभे राहते. त्यामुळे राज ठाकरेंसोबत त्यांचे कुटुंब गेले यावर कोणी टीका करू नये”, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कोहिनूर मिल प्रकरणी आज (२२ ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, राज ठाकरे हे ईडीच्या चौकशीसाठी सहकुटुंब गेल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ”राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण ? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा ? की सहानूभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न” असे ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे यांनी आता राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. “बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आपला भाऊ राज ठाकरे यांची बाजू घेतली”, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी

News Desk

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर

News Desk

धनंजय मुंडेच्या परळीतील कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, मेटे म्हणाले सामाजिक मंत्र्याचं भान…

News Desk