HW News Marathi
महाराष्ट्र

ताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना,छोट्याश्या मुलीची सुप्रियाताई सुळेंना आर्त हाक

जळगाव रावेर ताई , आमचे पप्पा खुप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण आमच्या केळीला भाव मिळवून द्या, अशी आर्त हाक चौथीत शिकणार्‍या राजश्री देवानंद पाटील या चिमुकलीने आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे करत आपल्या शेतातील केळी ताईंना भेट दिली.

राजश्रीची विनंती ऐकल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी केळीला भाव मिळवून देण्यासाठीच आम्ही ही हल्लाबोल यात्रा काढली असल्याची तिची समजूत घातली. तसेच आमचे नेते विधीमंडळात याबाबतीत आवाज उचलतील असे आश्वासन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगाव हून रावेर साठी निघाले होते. वाटते निंबोरा या गावात देवानंद पाटील यांची केळीची बागेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.

यावेळी शेतकरी देवानंद पाटील म्हणाले की, “सध्या केळीला ७०० प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात १००० ते १२०० भाव मिळत होता. करपा रोगाने यंदा केळीचे मोठे नुकसान केले असून त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. पिक विमा मिळायलाही अडचण येत आहे. त्यातच वीज बिल भरमसाठ आल्यामुळे ते भरले जात नाहीत. कर्जमाफी तर दुरच राहिली.”

त्या मुलीने दिलेली केळी ताई , धनंजय मुंडे व इतर नेत्यांनी खाऊन मुलीची समजूत काढत तिच्या पालकांना धीर देत पुढे मार्गक्रमण केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तरुणाच्या मृत्यूचं रहस्य उघड; मानखुर्द पोलिसांकडून २ आरोपींना अटक

Aprna

भाजपचे काँग्रेसीकरण सुरु झाले आहे !

News Desk

विश्वगुरुच्या कृपेने भारतात जगातील सर्वात जास्त महाग एलपीजी! – नाना पटोले

Aprna
Uncategorized

महाराष्ट्रात पुन्हा गारपिटीची शक्यता

swarit

पुणे – संपूर्ण महाराष्ट्रात २३-२४ फेब्रुवारीला पुन्हा एका गारपीटी होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे. गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, पिके सुरक्षित योग्य ठिकाणी ठेवावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसेच धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यातही गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related posts

वर्ध्याहून पायी तामिळनाडूला निघालेल्या २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वाटेत मृत्यू

News Desk

बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

Adil

हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, सर्व ठिकाणी आमची तयारी आहे

News Desk