HW News Marathi
Covid-19

पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा ! मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी ज्यांचे नाव सुरुवातीपासूनच अडचणीत आले आहे ते शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आज (२३ फेब्रुवारी) माध्यमांसमोर आले. यावेळी, राठोड यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनाच्या पुन्हा वाढणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच काही नियम आणि निर्बंध कडक करूनही, सूचना करूनही पोहरादेवी येथे या सगळ्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारची आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. “कोरोनाच्या काळात अशा रितीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर, संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी”, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा या आपल्या शासकीय निवास्थानी राज्यातील कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, “मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितले होते. कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत, पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे” असेही मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशीदेखील संसर्ग नियंत्रणात आणण्यासंदर्भात उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून मंत्री संजय राठोड यांच्यासाठी झालेल्या गर्दीबाबत येणाऱ्या वृत्तांची दाखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारवाईचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे, संजय राठोड यांच्या समर्थनार्थ उसळलेल्या या गर्दीला आणि अर्थात संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी हा धक्का दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पुर्ण लॉकडाऊन केला जर जनतेचा उद्रेक होईल”, फडणवीसांचा सरकारला इशारा

News Desk

लंडनहून दिल्लीत आलेल्या २६६ प्रवाशांपैकी ५ जणांना कोरोनाची लागण

News Desk

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे कॉंग्रेसची नाहक बदनामी, सोनिया आणि राहूल गांधींनी मागवला अहवाल

News Desk