HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यभरात कडाक्याची थंडी

मुंबई | राज्यभरात नाताळच्या आगमनानंतर कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. या हवामानमुळे मुंबईकर गारठले आहेत. मुंबई आज (२७ डिसेंबर) १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला तर मिळाली. परंतु मुंबईच्या रस्त्या आणि लोकल ट्रेनमध्ये मुंबईकर स्वेटर आणि शॉल परिधान करून थंडीचा आनंद घेत आहेत.

मुंबईत गेल्या दोन दिवसात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. मुंबईत काल (२६ डिसेंबर) कुलाब्यात २०.५ अंश सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज (२७ डिसेंबर) ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली पाहायला मिळत आहे. सांताक्रूजमध्ये आज १२.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

यंदाच्या वर्षात राज्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. सातारा, महाबळेश्वरमध्येही कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील २ ते ३ दिवस तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर २८ ते ३० डिसेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथे शीतलहरीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेबाहेर असतानाही बाळासाहेब ठाकरेंनी राज्यातील राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला!

News Desk

Exclusive| रोहित पाटलांची युवक प्रदेशाध्यक्षपदाची भूमिका काय? पुढील ध्येय कोणतं?

News Desk

बीडमध्ये जलयुक्त शिवार योजना घोटाळ्यात मोठी कारवाई, तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक

Aprna