HW News Marathi
महाराष्ट्र

Bhima Koregaon | आरोपीची चौकशी कुणी करायची ते आरोपी ठरवू शकत नाही

नवी दिल्ली | ‘नक्षली कनेक्शन’च्या संशयावरून अटक करणाऱ्यात अलेल्या पाचही विचारवंतांनी पुणे पोलिसांनी आपल्या विरोधात केलेली कारवाई ही राजकीय हेतूने केल्याचे म्हटले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी देखील केली आहे. सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान आरोपींची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

कुणीही आरोपी आपली चौकशी कुणी करायची, हे ठरवू शकत नाहीत, असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांनी वरवरा राव, अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना चपराक लगावली. एसआयटी स्थापन करण्यास स्पष्ट नकार देत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तपास पुढे नेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीस सरकारची अंध व्यक्तींवर मुजोरी

News Desk

राज्यात उद्याच होणार बहुमत चाचणी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

नारायण राणे यांचं जामिना नंतर पहिलं ट्विट! म्हणाले…..

News Desk
मुंबई

Dahi Handi | नयन फाउंडेशनच्या गोविंदांची आयडीयलच्या दहीहंडीला सलामी

News Desk

मुंबई | नयन फाउंडेशनने जनू अंध मुलां-मुलींना नवीन ज्योती दिली आहे. नेहमी अंध मुले-मुली म्हटले की, ते दुस-यांवर अवलंबून असल्याची कल्पना सर्वांच्या मनात घर करून बसली आहे. परंतु नयन फाउंडेशनने लोकांची ही कल्पना मोडीत काढली आहे. या सर्व अंध मुला-मुलींना एकावर एक थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी तयार करण्याचा संकल्प हाती घेतला.

नयन फाउंडशने २०१४साली मुलांना दहीहंडी पहिल्यांदा आयडीयलच्या दहीहंडीमध्ये सहभागी झाले. तेव्हा या मुलांनी त्यांच्या कौशल्यानी सर्वांना अवाक करत ही हंडी फोडली. यानंतर लोकांचा उत्साह पाहता या फाउंडेशने मुलींचे देखील गोविंदा पथक तयार करुन २०१७ पासून दहीहंडी फोडण्यासाठी फक्त तयार न करता खुद्द या मुलींनी हंडी फोडून मुलींमधील ताकद दाखविली.

नयन फाउंडेशनच्या गोविंदा पथक हे देशातील पहिले अंध पथक आहे. गेल्या ५ वर्षापासून या गोविंदा पथकाने ९० ते ९५ ठिकाणी थर रचून हंडी फोडली असून या दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचे नयन फाउंडेशनचे सचिव शार्दुल म्हाडगुट यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

Related posts

२२ मार्चला जनता कर्फ्यूच्या दिवशी मुंबई मेट्रो बंद असणार, तसेच मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक

swarit

शेतकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढू | मुख्यमंत्री

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Manasi Devkar