HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून बेस्टचे किमान प्रवास भाडे फक्त ५ रुपये

मुंबई । बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात मोठी कपात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये बेस्टचा प्रवास आता फक्त पाच रुपयांत करता येणार आहे. सरकारकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, बेस्टचे नवे दर आजपासून (९ जुलै) लागू होणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबईत किमान पाच रुपये भाड्यात बेस्ट प्रवास करता येणार आहे.

बेस्टने दिलेल्या प्रस्तावानुसार आणि राज्य परिवहन प्राधिकरणाने केलेल्या शिफारशीस राज्य शासनाच्या परिवहन विभागाने मान्यता दिली. त्यानुसार आज ही अधिसूचनाची आंबलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना आता मुंबईमध्ये स्वस्तात प्रवास करता येणार आहे. बेस्टसाठी आता किमान प्रवास भाडे पाच रुपये असेल. इतर टप्प्यांच्या प्रवास भाड्यातही कपात होणार असल्याची माहिती रावते यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात !

News Desk

“…असंच राहीलं तर आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटत राहणार,” मु्ख्यमंत्र्याचं कोल्हापुरातील गावकऱ्यांना आवाहन

News Desk

पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही ‘तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? रोहित पवारांचा भाजपला सवाल 

News Desk