HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता?

मुंबई | महाविकासआघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. या महाविकासआघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधीत दोन कॅबिनेट मंत्री ईडीच्या कोठडीत असून अनेक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणा श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. विरोधक महाविकासाघाडी सरकारवर या मुद्यांवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात काही दिवसांत मोठे फेरबदल करण्याची माहिती टीव्ही ९ मराठी सूत्रांकडून बातमी दिली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. या पेनड्राईव्हवरून विरोधकांनी सरकारला घेरले होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधकांना योग्य उत्तर न दिल्याने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानुसार मंत्रिमंडळात गृहमंत्री पदावर फेरबदल करणार होण्याची शक्यता वर्तावली जात आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निधी वाटपावरून दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आवळला जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा सार्वजनिक सभेत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसचे २५ आमदार महाविकासआघाडीवर नारज असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधींना भेटण्यासाठी गेले आहे. काँग्रेसचे नाराज आमदार आज सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्ला गेले आहेत. आमदार आणि सोनिया गांधी यांच्यात भेट झाली की नाही. आणि या भेटीत नेमके काय झाले हे अद्याप समजले नाही. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार? प्रकाश आंबेडकरांचा सवाल 

News Desk

‘नाचता येईना अंगण वाकडं’, प्रवीण दरेकरांची अशोक चव्हाणांवर खोचक टीका

Jui Jadhav

चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली संभाजी भिडेंची भेट

News Desk