HW News Marathi
देश / विदेश

वेळ आली तर स्वतंत्र लढू पण काँग्रेससोबत महाआघाडी नाहीच | मायावती

लखनौ | “काही झाले तरी काँग्रेससोबत महाआघाडी करणार नाही”, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केले आहे. “दिग्विजय सिंह हे भाजपाचे एजेंट आहेत. या दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यात जराही तथ्य नाही”, अशी टीका मायावतींनी केली आहे. “राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन्हीकडे आम्ही एकतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करु. वेळ आली तर स्वतंत्र लढू पण काँग्रेससोबत जाणार नाही”, असे मायावती पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करीत मायावतींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे कौतुक केले आहे. “सोनिया आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस-बसपाच्या आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र काँग्रेसच्या नेत्यांमुळे ते निष्फळ ठरले आहे”,असेही यावेळी मायावती म्हणाल्या आहेत. “केंद्र सरकारकडून दबाव आणल्याने मायावतींना आघाडी करण्यात रस नाही,”अशा शब्दात दिग्वजय सिंह यांनी मायावतींवर टीका केली होती.

बसपाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर महाआघाडीत सामील होणार नाही’, असे मायावतींनी आधीच स्पष्ट केले होते. याआधी बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसकडे उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ३९ राज्यांची मागणी केली होती. मायावती यांच्या या मागणीने काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होतीच. छत्तीसगढमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केलेल्या अजित जोगींसोबत एकत्र येण्याचा निर्णय बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण सोहळा

News Desk

आदित्य ठाकरेंचे मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याची केली मागणी 

News Desk

काश्मीरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडून जाळपोळ, सुरक्षा व्यवस्था वाढविली

News Desk
राजकारण

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

नवी दिल्ली | काँग्रेसतर्फे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कोल्हापूरमधून काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप नुकताच पुण्यात झाला. येत्या ४ ऑक्टोबर रोजी फैजपूर येथून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होत आहे. ४ ते ९ ऑक्टोबर दरम्यान फैजपूर ते अहमदनगर अशी ही यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेचा शुभारंभ १९३४ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनस्थळी होणार आहे.

४ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्यातून या यात्रेस सुरुवात होईल, ५ ऑक्टोबर रोजी जळगाव ते धुळ्यात यात्रा काढण्यात येईल, ६ ऑक्टोबर रोजी नंदुरबार, नाशिक व धुळे जिल्ह्यात तर ७ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच ९ ऑक्टोबर रोजी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

Related posts

उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करुन घ्यावी !

News Desk

मायावतीला धक्का, आयोगाच्या कारवाईवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

…हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक लढवून दाखवा, पंकजा मुंडेंचे आव्हान

News Desk