HW News Marathi
देश / विदेश

वेळ आली तर स्वतंत्र लढू पण काँग्रेससोबत महाआघाडी नाहीच | मायावती

लखनौ | “काही झाले तरी काँग्रेससोबत महाआघाडी करणार नाही”, असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केले आहे. “दिग्विजय सिंह हे भाजपाचे एजेंट आहेत. या दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यात जराही तथ्य नाही”, अशी टीका मायावतींनी केली आहे. “राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन्हीकडे आम्ही एकतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करु. वेळ आली तर स्वतंत्र लढू पण काँग्रेससोबत जाणार नाही”, असे मायावती पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करीत मायावतींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे कौतुक केले आहे. “सोनिया आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस-बसपाच्या आघाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र काँग्रेसच्या नेत्यांमुळे ते निष्फळ ठरले आहे”,असेही यावेळी मायावती म्हणाल्या आहेत. “केंद्र सरकारकडून दबाव आणल्याने मायावतींना आघाडी करण्यात रस नाही,”अशा शब्दात दिग्वजय सिंह यांनी मायावतींवर टीका केली होती.

बसपाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर महाआघाडीत सामील होणार नाही’, असे मायावतींनी आधीच स्पष्ट केले होते. याआधी बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसकडे उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये ३९ राज्यांची मागणी केली होती. मायावती यांच्या या मागणीने काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होतीच. छत्तीसगढमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केलेल्या अजित जोगींसोबत एकत्र येण्याचा निर्णय बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींचा यूएईच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान

Gauri Tilekar

पिझ्झा खाणे आता धोक्याचे… पिझ्झा डिलेव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह !

News Desk

जैन मुनी शांतिसागर यांना बलात्कार प्रकरणी अटक

News Desk