HW News Marathi
महाराष्ट्र

“ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ” – देवेंद्र फडणवीस

मुंबई। राज्यातील महा विकास आघाडी सरकार अर्थातच ठाकरे सरकारची द्विवर्षपूर्ती नुकतीच पूर्ण झाली आहे. आणि अशातच ठाकरे सरकारचा कार्यकाळावर राज्यातील विरोधकांनी मात्र टीका केलेली पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकर यासोबतच फडणवीसांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर विखारी टीका केली.

असं समीकरण जोडलेले असतानाच आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सरकार पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा केला आहे.

अशी सरकारं फार काळ चालत नाहीत

राज्यातील ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केल्याने विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा करण्यात आल्यावर फडणवीस म्हणालेत, बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं. जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ’.

सत्तारुढ पक्षाला त्याचे चिमटे बसता

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. पूर आला तरी आम्ही पोहोचतो. अतिवृष्टी झाली तरी आम्ही पोहोचतो, शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही गेलो. चिखलात जाऊन आम्ही त्याचं दुख: बघितलं आहे. एक दिवस आम्ही घरी बसलो नाही. विरोधी पक्षाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. म्हणूनच सत्तारुढ पक्षाला त्याचे चिमटे बसत आहेत. त्यामुळेच ते बोलत आहेत, असा घणाघात करत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल फडणीसांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार! – वर्षा गायकवाड

News Desk

‘चंद्रकांत दादा आपलं जितकं वय आहे, तितकी पवारांची संसदीय कारकीर्द आहे’ – रुपाली चाकणकर

News Desk

पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह, वरळी पोलीस कॅम्प सील

News Desk