HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमध्ये ‘या’ मंत्र्यांना मिळाले नाही पालकमंत्री पद

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची यादी काल (८ जानेवारी) जाहीर केली. ठाकरे सरकारमधील ४३ मंत्र्यांपैकी ७ मंत्र्यांना कुठल्याही जिल्ह्याचे पाकलमंत्रीपद मिळाले नाही. राज्याचे पालमंत्री पद न मिळालेले नेते आता फक्त राज्याचे मंत्री बनूनच त्या जिल्ह्याचा कार्यभार पाहणार आहेत. हे ७ मत्री पालकमंत्री पदापासून वंचित आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या ४, काँग्रेसच्या १ आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांचा समावेश आहे. त्यापैकी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही पालकमंत्रपदाची संधी मिळाली नाही. तर रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचीही कोणत्याच जिल्ह्यातील पालकमंत्रिपद दिलेले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद मिळालेले आहे. पालमंत्र्यांच्या यादीनुसार, अमरावती, बीड, बुलढाणा. चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर, उर्वरित १९ जिल्ह्यांना बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत.

‘या’ मंत्र्यांना मिळाले नाही पालकमंत्रिपद

  • जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री
  • संदीपान भुमरे – रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री
  • प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री
  • दत्तात्रय भरणे – राज्यमंत्री
  • राजेंद्र पाटील यड्रावकर – राज्यमंत्री
  • विश्वजीत कदम – राज्यमंत्री
  • संजय बनसोडे – राज्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळालेले आहे. तर कोकणातील दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळाले आहे. यात सिंधुदुर्गाचे पालकमंत्रिपद उदय रविंद्र सामंत यांच्याकडे तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपद अनिल दत्तात्रय परब यांना देण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी उत्तर प्रदेशात कंगणा विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल!

News Desk

कोरोनाकाळात महाराष्ट्रासोबत लसच नाही तर इतर वैद्यकीय उपकरण वाटपातही दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

News Desk

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरु व्हावी असे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar