HW News Marathi
देश / विदेश

निर्भया प्रकरणातील आरोपीकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना दिल्ली उच्च न्यायालायने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी विनय कुमार याने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही पेटीशन म्हणजे पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. न्यायालायने चार आरोपींना ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (७ जानेवारी) चारही आरोपींना डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे.

विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश सिंग अशी या चार नराधमानाची नावे आहेत. या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होत. याशिवाय एक आरोपी अल्पवयीन असल्याने, ज्युवेनाईल कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा ठोठावत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. २०१५ रोजी त्याची सुटका झाली.

तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कारातील चार दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी तयारी यापूर्वीच केली आहे. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्र फाशी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रात्री निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. यानंतर निर्भयाला पुढील उपचारासाठी सिंगापूरमध्ये नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला.

१६ डिसेंबरची ती काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात बहुसंख्य समाज हा रामाची पुजा करतो | भागवत

swarit

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी

News Desk

पुन्हा एकदा पीयूष गोयल यांच्या हाती रेल्वे मंत्री पदाचा कार्यभार

News Desk