HW News Marathi
महाराष्ट्र

गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे मागणी

मुंबई | ‘कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढू घ्या,’ अशी मागणी पानसरे कुटुंबियांनी आज (१४ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. रितसर अर्ज करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहे. तसेच  उच्च न्यायालयाने देखील एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, तुम्ही तुमच्या कामात थोडीतरी प्रगती दाखवा, अशा शब्दात न्यायालायने एसआयटीवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येत वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीतून शोधण्यासाठी न्यायालयाने सीबीआयला आणखी दोन आठवडे दिले आहेत. राज्य सरकारच्या एसआयटी (विशेष तपास पथका)कडून पानसरे हत्येचा आणि सीबीआयकडून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. मात्र, तपास हा अत्यंत धीम्या गतीने होत असल्याचा आरोप करणाऱ्या दोन्ही कुटुंबियांनी त्यांच्या याचिकेत उच्च न्यायालयात केला आहे.

‘कोल्हापूर परिसरात उद्भवलेली पूरपरिस्थिती आणि होत असलेला पाऊस या कारणांमुळेच आम्ही यासंदर्भात कोणताही कठोर आदेश काढणे तूर्तास टाळत आहोत, अशा शब्दात मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने महाराष्ट्र एसआयटीच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यंगचित्राच्या कुंचल्यातून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केंद्राला फटकारले…

News Desk

“जिथे पूर परिस्थिती होती तिथे अजूनही कोरोनाचं संकट घोंगावतये” – उद्धव ठाकरे

News Desk

अनिल देशमुखांच्या विरोधात याचिका दाखल करण्याऱ्या ॲड जयश्री पाटील कोण आहेत?

News Desk